गोंडाः नवरदेव सजला, लग्नस्थळी जाण्यासाठी घरातून वरात घेऊन निघाला. पण अचानक प्रेयसीने रस्त्यातच वरात अडवली अन् पुढे नाट्यमय घडामोडी घडल्या. उत्तर प्रदेशवरुन झारखंड येथे निघालेल्या नवरदेवाला त्याच्या प्रेयसीने चांगलाच धडा शिकवला आहे. गोंडा जिल्ह्यात राहणाऱ्या २१ वर्षीय महिलेचे या तरुणासोबत सूत जुळलं त्यांनी लग्नदेखील केल्याचा तिचा दावा आहे. मात्र, तरुणाच्या घरच्यांनी हुंड्यासाठी त्याचं दुसरं लग्न करण्याचा घाट घातला, अशी तक्रार या तरुणीने दिली आहे.

प्रियंका वर्मा असं हा तरुणीचं नाव असून तिने तिचं लग्न वाचवण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत मदतीची विनंती केली होती. प्रियंकाच्या म्हणण्यानुसार, तिचं लग्न धर्मपाल वर्मासोबत आधी झालं होतं. वैष्णवदेवीच्या मंदिरात त्यांनी लग्न केलं होतं. मात्र, धर्मपालच्या घरच्यांनी झारखंड येथील एका मुलीसोबत त्याचं लग्न ठरवलं. हुंड्यासाठी त्यांनी हे लग्न ठरवलं, असा आरोप प्रियंकाने केला आहे. धर्मपाल त्याच्या आई-वडिलांसाठी लग्नस्थळी रवाना होत असताना अचानक पोलिस त्याच्या घरी येऊन धडकले आणि त्याला व त्याच्या परिवाराला पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

महिलेने मुलासह स्वतःला ३ वर्ष घरातच कोंडून ठेवलं; पतीलाही घराबाहेर ठेवलं, कारण आहे भयंकर
यावेळी पोलिस ठाण्यात प्रियांकाच्या आई-वडिलांनाही बोलवण्यात आले. नंतर दोन्ही कुटुंबाच्या लोकांची समजूत घालून दोघांचंही लग्न लावून देण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेव आणि वधूचे आई-वडिल सामान्य शेतकरी आहेत.

फ्री वे ते ग्रँट रोड अंतर आता ७ मिनिटांत कापता येणार; कुठून, कुठपर्यंत जोडणार उन्नत मार्ग, वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here