पालघर: महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा भरधाव ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना पालघर रेल्वे स्थानकात घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हंसी मुकेश सिसोदिया (वय १८) असे या घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

हंसी मुकेश सिसोदिया ही १८ वर्षीय विद्यार्थीनी विरार येथील यशवंत कुंज परिसरातील रहिवासी असून पालघर येथील येथील सेंट जॉन महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी होती. बुधवारी नेहमीप्रमाणे ती आपल्या घरातून महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली. पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे स्थानकातून हंसी बोरिवली-वलसाड मेमू ट्रेन पकडून पालघर रेल्वे स्थानकात उतरली.

चेतनला पैसे द्याल… इतकं लिहून तरुणाने आयुष्य संपवलं, कारणही तेवढंच धक्कादायक
पालघर पूर्वेस असलेल्या सेंट जॉन महाविद्यालयात जाण्यासाठी रेल्वे पुलाचा वापर न करता रेल्वे रुळ ओलांडण्याचा निर्णय तिने घेतला. रेल्वे रुळ ओलांडून जात असतानाच भरधाव वेगाने आलेल्या तेजस एक्सप्रेस ट्रेनने हंसीला जोरदार धडक दिली. तेजस एक्सप्रेस ट्रेनच्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

पोलिसांनी महाविद्यालयीन आणि तिच्याकडे असलेल्या इतर ओळखपत्रावरुन हंसीची ओळख पटवली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना संपर्क करत याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. १८ वर्षाच्या हंसी सिसोदिया हिचा रेल्वे दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गर्लफ्रेंडने रात्री घरी बोलावलं, कुटुंबाला कळताच भयंकर घडलं; पत्नी म्हणते…
रेल्वे स्थानकावर वारंवार उद्घोषणा होत असतात की कुणीही रेल्वे रुळ ओलांडू नये. तरीही प्रवासी सर्रासपणे त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांमध्ये प्रवाशी जीव गमावतात. त्यामुळे थोडशासाठी आपला जीव धोक्यात घालू नका. रेल्वे रुळ ओलांडण्याऐवजी नेहमी रेल्वे पुलाचा वापर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here