जळगाव : रावेर तालुक्यातील अहीरवाडी येथील गावातील गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागून या भीषण आगीत ४ गुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. यात दोन म्हशी, एक बैल व एक रेडकू अशा गुरांचा समावेश आहे. तर आगीच एक बैल जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील अहीरवाडी येथे शेतकरी दगडू लासुरे हे गावात राहतात. घरापासून काही अंतरावर त्यांच्या गुरांच्या गोठा आहे. त्याच्याकडे एकूण दहा गुरे आहेत. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दगडू लासुरे यांनी त्याच्या गोठ्यात गुरे बांधली, त्यांना चारा पाणी करुन लासुरे हे घरी परतले. मध्यरात्री अचानक लासुरे यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागली. काही वेळातच आगीने भिषण रुप धारण केले, परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती शेतकरी दगडू लासुरे यांना दिली.

भरधाव एसटीची दुचाकीला धडक, ५ वर्षीय बालक ठार, आई-वडील गंभीर, संतप्त नागरिकांचा चक्काजाम
आगीची माहिती मिळताच लासुरे यांनी घटनास्थळ गाठले तसेच रावेर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागालाही घटनेची माहिती दिली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने लासुरे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, घटनेनंतर काही वेळातच रावेर नगरपालिकेचा अग्निशमन बंबसुध्दा पोहचला. नागरिकांसह अग्निशमन विभागाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. तोपर्यंत या आगीत दोन म्हशी, एक बैल व रेडकू अशा चार गुरांचा होरपळून मृत्यू झाला होता.

याठिकाणी एकूण दहा गुरे होती, त्यापैकी चार गुरांचा मृत्यू झाला, वेळीच घटना लक्षात आल्याने परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत, या गोठ्याजवळ बांधलेली इतर गुरांना सोडून दुसऱ्या ठिकाणी हलवले, त्यामुळे सहा गुरे ही सुखरुप राहिली. यात एक बैल आगीच्या झळांमुळे भाजल्याने जखमी झाला आहे. वेळीच प्रकार नागरिकांच्या लक्षात आला, नाहीतर संपूर्ण गुरे जळून खाक होवून मोठी घटना घडली असती, अशीही यावेळी चर्चा होती.

दिल्ली हादरले! प्रथम शाळकरी मुलीशी मैत्री केली, नंतर अपहरण करून तिला संपवले, कुटुंबीयांना मिळाला कुजलेले शव
शेतकऱ्याचे सुमारे ५ लाखांचे झाले नुकसान

दरम्यान, आगीत गोठ्यात ठेवलेले शेती उपयोगी लाकडी अवजारे, नळ्या, पाईप पुर्णपणे जळून खाक झाले असून शेतकरी लासुरे यांचे एकूण सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनेची माहिती मिळताच धनगर समाजाचे नेते संदीप सावळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चार गुरांचा मृत्यू तसेच शेजी अवजारे खाक होवून मोठे नुकसान झाल्याने या नुकसानाबद्दल शेतकरी दगडू लासुरे यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here