केपटाऊन: यंदाच्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषक जेतेपदाच्या एक पाऊल जवळ जात टीम इंडियाला पुन्हा माघारे फिरावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला अवघ्या पाच धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंडशी होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना २४ फेब्रुवारीला (शुक्रवार) केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. प भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील शेवटच्या षटकांमध्ये नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

शेवटच्या षटकांचा थरार

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना १७२ धावा केल्या होत्या. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला शेवटच्या पाच षटकात विजयासाठी ३९ धावांची गरज होती आणि त्यांच्या ५ विकेट शिल्लक होत्या. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी विजय तितकासा कठीण नसावा, पण कांगारूंविरुद्ध पुन्हा एकदा घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती झाली आणि भारतीय संघ निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १६७ धावाच करू शकला.
सामना सुरु असतानाच कॅप्टन हरमनप्रीत मैदान सोडून बाहेर का गेली, जाणून घ्या नेमकं काय घडलं
पाहिले तर डावातील १६ वे षटकही सामन्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरले. त्या षटकात डार्सी ब्राऊनच्या त्या षटकात एकच धाव मिळाली आणि रिचा घोषची विकेटही पडली. लाँग-ऑनवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात रिचा घोष झेलबाद झाली. आता भारताला विजयासाठी चार षटकांत ३८ धावांची गरज होती. १७ व्या षटकात पुन्हा सात धावा आल्या, त्यामुळे भारतासमोर आता १८ चेंडूत ३१ धावांचे लक्ष्य होते.

१८व्या षटकात स्नेह राणाने चौकार मारला, त्यामुळे त्या षटकात ११ धावा झाल्या आणि एक प्रकारे भारताने सामन्यात टिकून राहिला/ ऑस्ट्रेलियासाठी जेस जोनासेनने १९ वे षटक टाकले. त्या षटकात स्नेह राणा-दीप्ती शर्मा विशेष काही करू शकले नाहीत आणि केवळ चार धावा आल्या. स्नेह राणानेही शेवटच्या चेंडूवर आपली विकेट गमावली. आता भारताला शेवटच्या षटकात १६ धावा करायच्या होत्या, जे खूप कठीण होते. ऍशले गार्डनरच्या त्या षटकात केवळ १० धावा आल्या आणि त्यामुळे भारताला सामना गमवावा लागला.

भारत वर्ल्डकपमधून बाहेर… जिंकता-जिंकता टीम इंडिया हरली, हरमनप्रीतची झुंजार खेळी वाया…
भारतीय संघाच्या पराभवामागे कर्णधार हरमनप्रीत कौर धावबाद झाली हे कारण होते. १५व्या षटकात हरमनप्रीतने जॉर्जिया वेअरहेमला लागोपाठ चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. पण त्याच षटकात दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात ती धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये पोहोचली. ती गार्डनरच्या थ्रोवर अॅलिसा हिलीकडून धावबाद झाली.

टीम इंडियाला महिला विश्वचषक २०२० च्या अंतिम फेरीतही पाच वेळा टी-२० चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. तसेच गतवर्षी झालेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. बाद फेरीतील पराभवानंतर भारताची जागतिक विजेतेपदाची प्रतीक्षा आता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here