पाणी काढत असताना विवाहितेचा पाय घसरला आणि अचानक तोल जाऊन विहिरीत पडली. पत्नी बराच वेळ परत आली नाही, म्हणून ते धावत विहिरीवर गेले, तेव्हा पत्नी विहिरीमध्ये पडलेली दिसली. परंतु त्यांना पोहता येत नसल्याने त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू केला.
हा आवाज येताच शेतात शेजारील शेतकरी धावत विहिरी जवळ आले. परंतु तोपर्यंत महिलेचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती ठाणेदार राजवंत आठवले यांना कळताच त्यांनी बीट अंमलदार जाधव व काही पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले.
विहीर फार खोल असल्यामुळे पंचसमक्ष पंचनामा करून मार्ग दाखल केला. या घटनेमुळे सातगाव भुसारी गावांमध्ये व्यक्तहळ हळ केली जात आहे.
ग्रामीण भागातील महिलांचा दिवस हा गावातील विहिरीवर पाणी काढण्यापासून सुरू होतो. आजही ग्रामीण भागात बाराही महिने दररोज विहिरीवर जाऊन पाणी घ्यावे लागते. गावामध्ये पाणी योजना फक्त कागदोपत्रीच असल्याने बरेच गाव खेड्यामध्ये पाण्याची टाकी असते पण त्यातून पाणीपुरवठा होत नाही. लागेल तेव्हा गरजेनुसार महिला वर्ग घरापासून जवळ असलेल्या विहिरीवर जाऊन दैनंदिन पाण्याचे नियोजन करतात.
अनेक वेळा या पाणी प्रश्नावरून महिलांचे किंवा गावातील मुलींचे अपघात घेतील घडतात. जीवदान देणारे पाणी जीवघेणे ठरते. जेव्हा अपघात घडतो, तेव्हा काही काळ याची फक्त चर्चा होते. पण तोडगा काही निघताना दिसत नाही.
अंबाबाई मंदिरातील असं एक मंदिर जे अनेकांना माहीत नाही; वर्षातून ३ वेळा मंदिराचा दरवाजा उघडला जातो