अपहरण झालेल्या मुलांच्या कुटुंबीयांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करून शोध घेण्यास सुरूवात केली आहे. वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचघर हे गाव आहे. या गावातील चार अल्पवयीन मुलांचे अपहरण झाले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. अपहरण झालेल्यांमध्ये तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. मोनाली (वय १६), सपना (वय १६) आणि जय मांझे (वय १४), आशिका (वय १४) अशी या मुलांची नावे आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. मुलांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी चिंचघर येथील नलिनी अंकुश वाघ (वय ३५) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. २७ जुलैला दुपारी त्यांची मुलगी मोनाली, शेजारी राहणारी सपना, जय आणि आशिका हे चौघे गावाजवळील डोंगरावर रानभाज्या आणण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते परतलेच नाहीत. एकाच वेळी चौघे बेपत्ता झाल्यानं गावात खळबळ माजली आहे. गावकऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरात या सर्वांना शोधले. मात्र, त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I really like and appreciate your blog post.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Thank you for publishing this awesome article.