नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रोज लाखो लोक प्रवास करत असतात. अशात सगळ्यात मोठी चिंता असते ती आपल्या सामानाची. अनेकदा लोक एका राज्यातून दुसर्‍या राज्यामध्ये सामान पाठवण्यासाठीदेखील रेल्वेची मदत घेतात. अनेकदा लोकांना भीती असते ते आपलं सामान चोरीला जाऊ नये याची. पण आता भारतीय रेल्वेने प्रवास करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. यापुढे रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला आपल्या सामानाची काळजी करण्याची गरज नाही.

रेल्वे विभागाने दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार, भारतील रेल्वे लवकरच डिजिटल लॉक सिस्टम घेऊन येणार आहे. हे नवीन लॉक सिस्टम एका ओटीपीच्या माध्यमातून उघडेल. प्रत्येक रेल्वे स्थानकावर रेल्वेचे कर्मचारी ओटीपीच्या माध्यमातून सामानाची लोडिंग आणि अनलोडिंग करतील. खरंतर, याचा वापर सध्या ट्रॅकिंगसाठी केला जातो. ज्यामध्ये रेल्वेचं लाईव्ह लोकेशन आपल्याला पाहता येते. पण आता रेल्वे यामध्ये नवीन लॉक सिस्टम आणणार आहे. ज्यामुळे लोकांच्या सामानाची चोरी होण्याच्या घटना टाळता येतील.

कागद टाकला की हातात नोट! बीटेक-पीएचडीच्या विद्यार्थ्यांचं खतरनाक डोकं, टेकनिक पाहून चक्रवाल…

भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी….

सध्या या सिस्टमला हावडासह आणखी ३-४ डिव्हिजनमध्ये विकासित करण्याचं काम सुरू आहे. या सिस्टमच्या माध्यमातून प्रवाशांचा माल आणि पार्सल याला एक लॉक बसवण्यात येईल. जे उघडण्यासाठी ओटोपीची आवश्यकता असेल, असे याचे उद्देश आहे. रेल्वेच्या या नव्या निर्णयामुळे फक्त प्रवाशांनाच दिलासा मिळणार नाही तर यामुळे रेल्वेमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना थांबवण्यासाठी मोठी मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालवाहतुकीतून मिळणारा महसूलही यामुळे वाढेल.

अधिक माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच २५ जानेवारी २०२३ पर्यंत रेल्वेच्या सुरक्षा दलाने रेल्वेतून चोरी होणारी एकूण २५ लाखांची संपत्ती जप्त केली आहे. इतकंच नाहीतर या कारवाईमध्ये आतापर्यंत तब्बल ११,२६८ चोरट्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

Crime Diary : नदीतून निघाले एकामागे एक मृतदेह, पोलिसांना वाटली आत्महत्या; तपासात उलगडलं ७ जणांच्या हत्येचं गूढ

कशा पद्धतीने काम करेल हे नवीन सिस्टम….

रेल्वेद्वारा विकसित करण्यात येणारे डिजिटल लॉक सिस्टम हे ओटीपीच्या माध्यमातून उघडले आणि बंद केले जाईल. हा ओटीपी संबंधित रेल्वे कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर पाठवला जाईल. जेव्हा रेल्वे स्थानकावर थांबेल तेव्हा पायलटला लॉकचं बटण दाबावं लागेल. यानंतर रेल्वे अधिकारी ओटीपीने व्हेरिफिकेशन करतील आणि यानंतर लॉक उघडले जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर या डिजिटल लॉकसोबत कोणी छेडछाड केली किंवा दरवाजा आपण्याचाही जरी आवाज झाला तर यासंबंधी तातडीने अधिकाऱ्यांना मोबाईलवर माहिती मिळेल. या डिजिटल लॉक सिस्टमद्वारे ट्रेनला ट्रॅकही करता येईल आणि रेल्वेचे लाईव्ह लोकेशनही मिळवता येईल, अशी माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आहे.

भारताला मिळालेल्या खजिन्याबद्दल आलं मोठं सत्य समोर, आता पुढे काय होणार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here