जालना : शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने कापसाची पेरणी केली,निसर्गाची चांगली साथ दिल्याने कापसाचे उत्पादन चांगल्यापैकी झाले. पण बळीराजाला अनेक समस्यांचा सामना करावाच लागलो. त्यात या वर्षी कापसाला चांगला भाव भेटेल म्हणून शेतकऱ्यांनी काढलेला कापूस घरात लाऊन ठेवला. दिवसामागे दिवस सरले पण भाव वाढत नसल्याने शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीला आला आहे.अखेर आता कंटाळून शेतकरी घरातला कापूस काढून विकायला मजबूर झाले आहेत. जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील दत्ताभाऊ वरखेडे यांनी ६० क्विंटल कापूस विक्रीसाठी आयशरमध्ये भरला. पण रात्रीतून अज्ञात चोरंट्यांनी वाहनासह कापूसही चोरून नेला.दत्ताभाऊ वरखेडे यांनी या घटनेची माहिती घनसावंगी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी अवघ्या ६ तासात सदर आयशरसह ६० क्किंटल कापसाचा शोध लावला आहे. सदरील चोरीचा शोध पोलिसांनी लावल्यामुळे कापसाचे व आयशरचे दत्ताभाऊ वरखेडे (रा. रांजणी ता. घनसावंगी) यांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य आले.

रांजणी ता. घनसावंगी येथील दत्ताभाऊ वरखेडे यांनी २३ मार्च रोजी ६० क्विंटल कापूस आयशरमध्ये (क्र.एम.एच. १३ आर ०८८९)विक्रीसाठी भरून रांजणी येथील तुळजाई कृषी सेवा केंद्रासमोर उभा केला होता. याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरंट्यांनी भरलेल्या कापसासह आयशर चोरून नेला.ही घटना सकाळी शेतकरी दत्ताभाऊ वरखेडे यांच्या लक्षात येताच त्यांना रडू कोसळले.

VIDEO | अमरावतीत विद्यार्थ्यांसह निघालेला ट्रॅक्टर पलटला, २५ जण गंभीर जखमी

चोरीबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दत्ताभाऊ वरखडे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरील आयशर हे ६० ते ७० किलोमीटर गेल्यावर आपोआप बंद पडते असे त्यांनी सांगितले. त्यावरून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके तैनात केली. घटनास्थळापासून ६० ते ७० कि.मी.अंतरापर्यंत चोरी गेलेल्या आयशर ट्रक व कापसाचा परिसरात शोध घेतला.

Sanjay Raut: पूर्वीच्या आणि आताच्या फडणवीसांमध्ये खूप फरक, आता त्यांना सनसनाटी निर्माण करण्याचा छंद जडलाय:राऊत

सीसीटीव्ही फुटजेच्या आधारे सदरील कापूस व आयशरचा अवघ्या ६तासात पोलिसांनी शोध घेतला. सदरील कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र खलसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय जाधव, पोलीस नाईक बाबासाहेब डमाळे, सुनिल वैद्य, गणेश मोरे आदिंनी पार पाडली. सदरील घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक टाकसाळ करत आहे. आयशर आणि कापूस दोन्ही मिळून आल्याने शेतकऱ्यांनी पोलीस खात्याचे आभार मानले आहेत.

शाळकरी विद्यार्थ्यांची व्हॅन भररस्त्यात पेटली; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला; आगीचा थराराक VIDEO

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here