पुणे : पुणे जिल्ह्यातील कल्याण – नगर महामार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो आणि पिकअप यांची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर नऊ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावाजवळ हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नगरच्या दिशेने येणाऱ्या गाडीला पिकअपला टेम्पोची जोरात धडक बसली. टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने थेट पिकअप गाडीला धडक दिली. अचानक झालेल्या या अपघातात पिकअप मधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. समोरासमोर धडक झाल्याने दोघं वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

चिंचवडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, मतदानापूर्वी राष्ट्रवादी-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचललं
पहाटेच्या वेळी हा अपघात झाला असल्यामुळे उपचार मिळण्यास उशीर झाला. त्यामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत अपघातात नक्की चूक कुणाची याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

चिक्कू का तोडला? महिलेने हटकलं, तरुणाला खटकलं; घरात शिरून महिलेवर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here