मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही सल्ला देता का? असा सवाल फडणवीस यांना विचारला असता, मी कुणालाही फुकटचा सल्ला देत नाही. सल्ला मागितला तर जरूर देईल. सल्ला देण्याऐवढा मी काही मोठा नाही. माझा जो काही अनुभव आहे तो मी पत्ररुपाने त्यांना सांगत असतो. त्यांना काही सांगायचं असेल तर पत्रं लिहितो. त्यावर निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. पण जिथे कमतरता दिसते ते त्यांच्या लक्षात आणून देतो. राज्याच्या हिताचं जे काही असेल ते सांगत असतो, असं सांगतानाच मी मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रं लिहिली पण त्यावर त्यांनी मला अद्याप एकदाही उत्तर दिलं नाही. नाही म्हणायला नायरमधील रुग्णसंख्या दडवल्याचा प्रकार मी उघडकीस केला होता. मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे तसे लक्षात आणून दिलं होतं. त्यावर त्यांनी मला फोन करून या प्रश्नात लक्ष घालणार असल्याचं सांगितलं होतं. हा अपवाद वगळता त्यांनी कधीच माझ्या पत्रांना उत्तर दिलं नाही, असं फडणवीस म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी माझ्या पत्रांना उत्तरं दिली नसली तरी माझ्या पत्रांची दखल घेऊन त्यांनी काही निर्णय घेतले आहेत. सर्वच पत्रांची दखल घेऊन निर्णय घेतलेले नसले तरी काही निर्णय घेतल्याचं मलाही दिसून आलं आहे. असं सांगतानाच मी कधीही विरोधाला विरोध करत नाही. हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे समन्वय साधण्यावर माझा भर असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात स्वयंघोषित मुख्यमंत्रीही आहेत
सरकारचं स्टिअरिंग कुणाच्या हाती आहे, हे मला माहीत नाही. स्टिअरिंग कुणाच्या हातात असावं हे उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवावं. हे सरकार तीन इंजिनच्या ट्रेनसारखं आहे. खरं तर ट्रेनला दोनच इंजिन असतात, पण यांच्या ट्रेनला मध्येही एक इंजिन आहे. त्यामुळे यांची गाडी नक्की चाललीय कुठे? हेच कळत नाही, असा चिमटा त्यांनी काढला. राज्यात अनेक मुख्यमंत्री आहेत. काही सुप्रिम मुख्यमंत्री आहेत तर काही स्वयंघोषित मुख्यमंत्रीही आहेत. आता ही स्वयंघोषित मुख्यमंत्री कोण? हे तुम्हीच ओळखा. मी कशाला सांगू, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री प्रशासन भरोसे
राज्यात मंत्र्यामंत्र्यांमध्ये आणि मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही. सर्व गोंधळ आहे. प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा आहे. विचार वेगळा आहे. एकजण निर्णय घेतो तर दुसरा निर्णय रद्द करतो. मुख्यमंत्र्यांना कोणी विश्वासात घेत नाही, अशी सर्व स्थिती आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री पूर्णत: प्रशासनावर अवलंबून आहे. प्रशासनावर अवलंबून असणं गैर नाही. पण किती असावं याला मर्यादा आहेत. घोडा कितीही चांगला असला तरी त्यावर विश्वास ठेवता येत नाही. त्याच्यावर कमांड हवीच, असा टोलाही त्यांनी लगावला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
Thank you ever so for you article post.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.