रत्नागिरीः रायगड जिल्ह्यातही आठवडाभरापुर्वी दोन जणांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातही हे प्रकार घडू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशीच एक आत्महत्या दापोली तालुक्यात शिवनारी गावात घडली आहे. ४७ वर्षांच्या इसमाने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राजेश महादेव गावडे रा. शिवनारी आदर्शवाडी असे या आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

राजेश गावडे याने दारूच्या नशेमध्ये घरातील बाथरूममधील लोखंडी ऍगलला साडीच्या फाडलेल्या चिंधीने गळफास लावून घेतला. सोमवारी सायंकाळी उशिरा हा धक्कादायक प्रकार घरी असलेल्या पत्नी व मुलीने शोधाशोध केल्यावर लक्षात आला बाथरूममध्ये हे भयानक प्रकार पाहून दोघीही हादरल्या. त्यांनी तात्काळ त्यांना खाली उतरवून जवळच्या डॉक्टरना बोलावले डॉक्टरनी तपासणी करुन तात्काळ दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. मद्यधुंद पोलिसाकडून १८ वर्षांच्या तरुणाला बेदम मारहाण; कुटुंबीयांचा आरोप, धक्कादायक कारण सांगितलं
वडिलांना दापोली येथील दवाखान्यात हलवण्यासाठी प्रयत्न केले. वाहन व एम्ब्युलन्स मिळेपर्यंत वेळ गेला रात्रीच्या सुमारास उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हारुग्णालय दापोली येथील वैद्यकीय अधिकारी यांनी २२.३० वा.च्या सुमारास तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले.

राजेश गावडे याला दारूचे व्यसन होते त्यामुळेच दारूच्या नशेतच हे धक्कादायक टोकाचे पाऊल उचलत ही आत्महत्या केल्याने शिवनारी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. राजेश गावडे त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी,तीन मुले एक मुलगी असा मोठा परिवार आहे.

महिलेच्या हाती पेनड्राइव्ह लागला, पतीचे कारनामे पाहून हादरलीच; पत्नीने घेतला टोकाचा निर्णय
तालुका आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा

दरम्यान, ही दुर्देवी घटना काल घडल्यावर गावडे यांना उपजिल्हारुग्णालयात नेण्यात आले येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या सगळ्या प्रकरणाची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शवविच्छेदन झाल्याशिवाय हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. पण काल सोमवारी रात्रीपासून आज मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडुन शवविच्छेदन करण्यास डॉक्टरच वेळेत आले नाहीत त्यामुळे दुःखात असलेल्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा या तालुका आरोग्य विभागाच्या या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.

५ लाखांची गुंतवणूक करा, मॅच्युरिटीनंतर मिळतील ५० लाख; LICच्या या पॉलिसीबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंजर्ले येथील वैद्यकीय अधिकारी आल्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या सगळ्या मृत्यू प्रकरणाची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here