An old man dead in an accident, बेदरकार ऑटोरिक्षा चालकाने दिली वृद्धाला धडक आणि झाला पसार, वृद्धाने गमावला जीव – nagpur accident an elderly citizen lost his life in a collision with an autorickshaw
नागपूर : बेदरकारपणे गाडी चालवत असताना एका ऑटोचालकाने वृद्धाला जोरदार धडक दिली आणि पळून गेला. अपघातात जखमी झालेल्या वृद्धाला तातडीने उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रामा लक्ष्मण निमजे (६०, बिनाकी मंगळवारी, कांजी हाऊस चौक) असे मृत वृद्धाचे नाव आहे. तर, दुसरीकडे लकडगंज पोलिसांनी आरोपी ऑटोचालक लखन जयराम कोतकर (३५, डेप्युटी सिग्नल, बजरंग चौक) याला अटक केली आहे.
या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी रोजी वर्धमान नगर येथील मेहता पेट्रोल पंपाजवळ एक वृद्ध व्यक्ती जखमी अवस्थेत आढळून आली होती, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे रात्री ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. घटनास्थळी लावलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. जीवघेणी ठरतेय ही नशा; पोलादपूरमध्ये ५५ वर्षीय व्यक्तीने संपवले जीवन, अशा घटना का वाढत आहेत दरम्यान, एका ऑटोचालक वृद्धाला धडक देऊन पळून जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे ऑटोच्या क्रमांकाच्या आधारे आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीचा ऑटोही जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, शहरात अपघात वाढल्याचं चित्र आहे. भरधाव जाणाऱ्या वाहन चालाकांना लगाम लावण्याची गरज आहे. अशा प्रकारे वाहने चालवल्यास रस्त्यावरुन चालणाऱ्यांच्या जीवाला देखील धोका उद्भवू शकतो. अशा प्रकारच्या सुसाट चालणाऱ्या वाहनांचे नियमन करणं गरजेचं आहे. त्यांच्यावर कडक निर्बंध लावल्यास अशा प्रकारचे अपघात टाळले जातील, असे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
वाहतुकीचे नियमन केल्यास शहरातील प्रत्येक भागात त्याचा फायदा होऊ शकेल. सुसाट वाहनांमुळे पादचाऱ्यांनाही त्रास होतो. सुसाट वाहन चालवणाऱ्यांवर वचक राहिल्याचं दिसंत नाही. शहरातील वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष द्यायला हवं. अशा सुसाट वाहनांच्या भरधाव चालवण्याने विनाकारण त्याचा शहरातील रहिवाशांना त्रास होतो आहे. आता यावर प्रशासन काय उपाययोजना करणार, वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष देणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.