महापालिकेत केलेल्या आंदोलनांसाठी जाधव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालानं जाधव यांना ४ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर परिचारिकांसाठी आंदोलन करत असताना जाधव यांना ही नोटीस मिळाली. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी याबाबत माहिती दिली.
हेही:
त्यानुसार ठाणे, ठाणे ग्रामीण, बृहन्मुंबई, रायगड या भागातून त्यांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव आहे. त्याबाबत त्यांना पोलिसांसमोर जाऊन स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. जाधव यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. ‘मुंबई, ठाण्यात एवढे गुंड आहेत. त्यांना कधी अशा नोटिसा येत नाहीत आणि लोकांसाठी आंदोलनं करणाऱ्यांना तडीपारीच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. लोकांसाठी काम केल्याबद्दल, कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी बसेस सोडत असल्याबद्दल राज्य सरकारनं दिलेलं हे बक्षीस आहे, असं अविनाश जाधव म्हणाले.
आंदोलने सुरूच!
हद्दपारीची नोटीस आल्यानंतरही जाधव यांनी आंदोलनं सुरूच ठेवली आहेत. करोना रुग्णालयातील परिचारिकांसाठी आज त्यांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले. परिचारिकाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आंदोलक परिचारिकांना महापालिकेने नियुक्त केले होते. आता ठेकेदाराच्या माध्यमातून काम करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्याविरोधात जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज मनसैनिकांनी आंदोलन केले. परिचारिकाच्या आंदोलनामुळे परिस्थिती चिघळू नये म्हणून जाधव यांना ठाणे पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times