नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतील प्रदूषणाचा मुद्दा नेहमी चर्चेत येते. दिल्ली पाठोपाठ आता मुंबईतील प्रदूषणाबद्दल मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे. अशात लोकसभेत सरकराने दिलेल्या प्रदूषित शहरांची यादी जेव्हा सादर करण्यात आली तेव्हा सर्वात मोठा धक्क बसला तो महाराष्ट्राला होय.

संपूर्ण भारतात फक्त राजधानी नवी दिल्ली आणि त्याचा परिसर प्रदूषित नाही तर देशातील १३१ शहर आणि परिसर असे आहेत जे अतिशय प्रदूषित आहेत. या १३१ शहरात हवेची गुणवत्ता ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक खराब आहे. केंद्र सरकारकडून या शहरातील हवेच्या गुणवत्तेवर वारंवार नजर ठेवली जात आहे.

वनडे आणि टी-२० क्रिकेटला लाजवेल असा थरार; कसोटीमध्ये ३० वर्षानंतर आणि फक्त दुसऱ्यांदा…
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या शहरांना नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत ठेवण्यात आले आहे. जेणेकरुन या शहरातील हवेची गुणवत्ता सुधारता येईल. २४ राज्यातील १३१ शहरातील Particulate Matter मध्ये २० ते ३० टक्के घट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य २०२४ ते २०२८ या काळासाठी ठेवण्यात आले आहे.

भारतीय संघासाठी आली गुड न्यूज, ICCची मोठी घोषणा, २०२४च्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत मिळणार…
सर्वाधिक प्रदूषण असलेली शहरे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील १९ शहरे प्रदूषितअसून गेल्या पाच वर्षात येथील हवेचे प्रदूषण राष्ट्रीय सरासरी पेक्षा अधिक आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो, येथील १७ शहर प्रदूषित आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश १३, पंजाब ९ आणि ओडिशा, मध्य प्रदेश आणि हिमाचलमधील प्रत्येकी ७ शहरांचा समावेश होतो.

महाराष्ट्रातील ही १९ शहरे प्रदूषित

अकोला
अमरावती
औरंगाबाद
बदलापूर
चंद्रपूर
जळगाव
जालना
कोल्हापूर
लातूर
मुंबई
नागपूर
नाशिक
नवी मुंबई
पुणे
सांगली
सोलापूर
ठाणे
वसई-विरार
उल्हासनगर

महाराष्ट्रातील अडीच हजार महिलांना फसवून ओमान, दुबईत नेले; मोबाईलही काढून घेतल्याने ठावठिकाणा नाही
पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी १३ फेब्रुवारी २०२३ रोजी लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात या शहरांची यादी दिली आणि यासंदर्भात काय उपाय योजना केल्या जात आहेत याची माहिती दिली. गेल्या ५ वर्षातील आकडेवारीच्या आधारावर ही यादी करण्यात आली असून या शहरांची लोकसंख्या ८० लाखांपेक्षा अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here