अजित पवार काय म्हणाले?
आठ महिन्यांपूर्वी हे सरकार सत्तेवर आलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला. त्यानंतर पहिला झटका बसला. भाजपच्या आमदारांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असं वाटत होतं. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माझ्याशी बोलताना हे काय होऊन बसलं असं म्हटल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. भाजपच्या काही जणांनी ८० ते ८५ लोकांनी बंड करायचं का असं म्हटलं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी असलं काही करु नका, त्या दोघांना कळलं तर सगळा सुपडा साफ होईल असं म्हटलं. वरुन आदेश आहे, असं म्हटल्यानं सगळे शांत बसले.
सरकार सुरु झाल्यानंतर सुरुवातीला दोघेच मंत्री होते. पुढचे काही दिवस आम्ही खंबीर असल्याचं ते सांगत होते, असं अजित पवार म्हणाले. पुढील काही दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. आठ महिने झाले मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, असं अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्रात यांचं सरकार आल्यानंतर सहा महिन्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या. पाच मतदारसंघापैकी चार जागा पराभूत झालेत. डॉ. रणजीत पाटील पहिल्या क्रमांकाच्या पसंतीक्रमानं निवडून येतील असं म्हटलं होतं, तेही पराभूत झाले, असं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांची मराठीबाबत उदासीन भूमिका दिसून आली त्यामुळं महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
[url=https://omg.omgomgweb.com/]omg omg darkmarket форум[/url] – ссылка на omgomg, omg omg onion ссылка