रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यंत सर्वाधिक वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकलेले आहे. धोनीनंतर रोहित हा यशस्वी कर्णधार असल्याचे म्हटले जात आहे. पण मुंबई इंडियन्स मैदानाबाहेरच कसा अर्धा सामना जिंकते, याचे रहस्य आज उलगडलेले पाहायला मिळाले आहे.
मुंबई इंडियन्स हा संघ रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांची पत्नी नीता यांचा मालकीचा आहे. नीता या स्वत: संघाच्या गोष्टींमध्ये लक्ष घालत असतात. त्याबरोबर त्यांचा मुलगा आकाशही संघातील बऱ्याच गोष्टी पाहत असतो. मुंबई इंडियन्स लिलवाच्या टेबलवरच अर्धा सामना जिंकतो, असे मत भारताच्या माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे. लिलावाच्या वेळी मुंबई इंडियन्स असे काही खेळाडू निवडते की, पुढे जाऊन त्यांच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते, असे म्हटले जाते.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने यावेळी सांगितले की, ” लिलाव जेव्हा होतो तेव्हाच मुंबई इंडियन्सचा संघ अर्धा सामना जिंकलेला असतो. कारण लिलावाच्या टेबलवर मुंबई इंडियन्सची रणनिती सर्वात चांगली असते, असे पाहायला मिळाले आहे. कारण ते ज्या प्रकारे खेळाडू निवडतात, ते पाहून त्यांचा अभ्यासही असल्याचे पाहायला मिळते. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडू आणि संघातील स्थानासाठी त्यांच्याकडे पर्यायी खेळाडू उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते.”
आकाश पुढे म्हणाला की, ” युवा खेळाडूंना निवडण्यातही मुंबई इंडियन्सचा हातखंडा आहे. कारण मुंबई इंडियन्स युवा गुणवत्ता कुठून शोधून आणते, हेदेखील पाहायला हवे. कारण चांगले युवा खेळाडू हे मुंबई इंडियन्सच्या संघात आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्यावर चांगले संस्कारही संघात असताना केले जातात.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
Thank you ever so for you article post.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.