मुंबई : यंदाचे आयपीएल खेळवण्यासाठी बीसीसीआयने चांगलीच कंबर कसलेली आहे. आयपीएलचे आयोजन यशस्वी करण्यासाठी आता बीसीसीआयने काही गोष्टी करायचे ठरवले आहे. करोनाच्या काळात जास्त लोकांबरोबर प्रवास करणे आणि त्यांची व्यवस्था करणे सोपे नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघातील खेळाडूंची संख्या कमी करण्यात येणार असल्याचे समजते.

आयपीएलमध्ये आठ संघ आहेत. आयपीएलच्या प्रत्येक संघात ३०-३५ खेळाडू असल्याचे पाहायला मिळते. त्याचबरोबर १०-१५ जणांचा सपोर्ट स्टाफ असतो. त्यामुळे ही संख्या ५० पर्यंत जाते. यावेळी आपल्या बायकांनादेखील युएईतील आयपीएलसाठी न्यावे, अशी विनंतीही बीसीसीआयला करण्यात आली आहे. जर प्रत्येक संघातून जवळपास १०० व्यक्ती युएईला जाणार असतील, तर सर्व काही कठीण होऊन बसेल. त्यामुळे बीसीसीआयने सर्वच संघांच्या मालकांना खेळाडूंची संख्या कमी करण्यासाठी विनंती केली आहे.

ही स्पर्धा भारतात असली असती तर खेळाडूंच्या संख्येवर मर्यादा आली नसती. पण ही स्पर्धा युएईमध्ये होणार असून त्यासाठी जास्त खर्च होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी खर्च आणि जोखीम कमी करण्यासाठी बीसीसीआयने प्रत्येक संघ मालकांना आपल्या संघात २० खेळाडूच ठेवावेत, अशी विनंती केली असल्याचे समजत आहे. त्यामुळे आता याचा आयपीएलमधील सामन्यावर किती परीणाम होईल, हे स्पर्धा सुरु झाल्यावर पाहायला मिळेल.

आयपीएलच्या वेळपत्रकात आता बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी आयपीएल हे १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळवण्यात येणार होते. आयपीएलचा अंतिम सामना ८ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार होता. पण आता आयपीएलच्या वेळापत्रकात बदल केल्याचे पाहायला मिळत आहे.

काही कारणास्तव आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या वर्षीचे आयपीएल हे १९ सप्टेंबरलाच सुरु होणार आहे. पण आयपीएलचा अंतिम सामना पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. आता आयपीएलचा अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला होणार असल्याचे समजते आहे. पण आयपीएलच्या मार्गातील एक समस्या अजूनही सुटलेली दिसत नाही.

बीसीसीआयसाठी आयपीएलचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे. पण तरीही आयपीएलच्या आयोजनात एक महत्वाची अडचण आहे. ही अडचण म्हणजे जोपर्यंत बीसीसीआयला भारत सरकारची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत आयपीएल खेळवण्यात येऊ शकत नाही. कारण भारत सरकारने जर आयपीएलला परवानगी दिली नाही तर आयपीएल होऊ शकत नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलसाठी भारत सरकारची परवानगी कशी मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here