मुंबईः करोनाचे संकट जरी असले तरी सतत ठेवणं बंद केलं पाहजे. आज लॉकडाऊनमुळं अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. असं परखड मत केंद्रीय मंत्री यांनी मांडलं आहे.

करोनाचे संकट आज भारतासह संपूर्ण जगावर ओढावलं आहे. या संकटाचा सामना हिमतीने करण्याची गरज आहे. करोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टनसिंग, हात धुणे, मास्क लावणे हे उपाय योजून वावरावं लागेल. करोनासोबत आता जगावं शिकावं लागणार आहे. मात्र, सततचा लॉकडाऊन हा काही प्रभावी उपाय नाही. जास्त काळ लॉकडाऊन ठेवल्यानंतर लोकांच्या नोकऱ्या जातील, रोजगार सुटतील, मग अशा समस्यांना तोंड द्यावे लागले. असंही ते म्हणाले. लॉकडाऊन सातत्याने वाढवणं योग्य नाही, हे माझं व्यक्तिगत मत आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

वाचाः

परिस्थीती भयंकर आहे, पहिल्यांदाच आपण अशा परिस्थितीचा सामना करतोय. करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी नियम पाळून आपण जगणं सुरळीत केलं पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाताना सरकारचे नियम व गाइडलाइनचं पालन करावेच लागेल. हे संकट कधी संपेल हे आपण सांगू शकत नाही. करोनाची लस मिळेपर्यंत तारेवरची कसरत करावीचं लागणार आहे. लॉकडाऊन असाच सातत्याने वाढवला तर करोनापेक्षाही त्यानंतर येणारं आर्थिक संकट सावरण्याचं सरकारसमोर मोठं आव्हान असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाः

कोणतंही राजकारण न करता या गंभीर समस्येतून वाट काढावी लागणार आहे. भारत सरकारचा महसूलही कमी झाला आहे. तरीही सरकारनं जनधन योजनेत ३८ कोटी खाती उघडली आहेत. सरकार म्हणून आम्ही जनतेच्या मागे आहोतच. केंद्राची जबाबदारी संपलेली नाहीये आत्मविश्वासानं आम्ही सगळ्यांच्या मागे उभं आहोत, असंही ते म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here