जयपूर: राजस्थानमधील राजकीय संकटनाट्याला () दररोज नवे वळत मिळत आहे. आज शुक्रवारी मुख्यमंत्री यांनी आपल्या गटातील आमदारांना जयपूरहून जैसलमेरला हलवले. मात्र, या प्रवासादरम्यान गहलोत गटातील ११ आमदार बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गहलोत सरकारमधील ६ मंत्री आणि ५ आमदार आतापर्यंत जैसलमेरला पोहोचलेले नाहीत. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ( and five mlas of camp did not reach )

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरहून जैसलमेरला न पोहोचणाऱ्या मंत्री आणि आमदारांमध्ये परिवहन मंत्री प्रतापसिंह खाचरियावाल, आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा, क्रीडा मंत्री चांदना, कृषी मंत्री लालचन्द कटारिया, आरोग्य राज्यमंत्री सुभाष गर्ग, सहकार मंत्री उदयलाल आंजना, आमदार जगदीश जांगिड, आमदार अमित चाचाण, आमदार परसराम मोरदिया, आमदार बाबूलाल बैरवा आणि आमदार बलवान पूनिया यांचा समावेश आहे. हे मंत्री आणि आमदार अजूनही जैसलमेरला पोहोचलेले नाहीत.

वाचा:

आमदारांवर बाहेरून दबाव टाकला जात होता- गहलोत

गेल्या अनेक दिवसांपासून जयपूरमध्ये असलेल्या आमच्या आमदारांना मानसिकदृष्ट्या त्रास दिला जात होता, असे मुख्यमंत्री गहलोत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. इतकेच नाही, तर आमदारांच्या कुटुबीयांवर देखील दबाव टाकला जात होता, असेही गहलोत म्हणाले. हा बाहेरून येत असलेला दबाव दूर व्हावा म्हणूनच आपण आमदारांना जयपूरहून जैसलमेरला हलवण्याचा विचार केला आणि हलवले सुद्धा असे सांगतानाच लोकशाही वाचवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे गहलोत पुढे म्हणाले.

वाचा:

गहलोत यांचा भाजपवर निशाणा
या आमदारांना जैसलमेरला हलवण्यापूर्वी बहुजन समाज पक्षाच्या ६ आमदारांचे काँग्रेसपक्षात प्रवेश करण्याबाबत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. भारतीय जनता पक्षाने तेलुगु देसम पक्षाच्या ४ खासदारांना राज्यसभेत रातोरात भाजपत घेतले. ते कृत्य चांगले आणि राजस्थानात जर ६ आमदार पक्षात आले असतील तर ते चुकीचे आहे, तर मग भाजपचे चरित्र कुठे गेले?, असा प्रश्न गहलोत यांनी उपस्थित केला आहे.

नक्की वाचायला हवी अशी बातमी:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here