हापूस आंबा २ हजार ते ७ हजार रुपये पेटी प्रमाणं विकले जातात. एका पेटीमध्ये ४ ते ८ डझन आंबे असतात. आंब्यांची संख्या दर्जावर अवलंबून असते. हापूसच्या एका पेटीची किंमत ४ ते १० हजारांवर देखील जाते.
उन्हाची तीव्रता वाढून आंब्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये म्हणून गेल्या ४ ते ५ वर्षांपासून फेब्रुवारी ते मार्च महिन्यात ५ ते ८ हजार आंब्यांच्या पेट्यांची आवक सुरु होते, असं जाणकारांनी सांगितलं आहे. बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी यावेळी आवक वाढल्याचं सांगितले.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाजार समितीत ११ हजार पेट्या दाखल होत आहेत. महाराष्ट्र आणि राज्याबाहेरुन आंब्यांची आवक होत आहे. महाराष्ट्रातून नवी मुंबई बाजार समितीत ६० टक्के आवक होत आहे. कोकणातील रत्नागिरी, देवगडमधून सर्वाधिक आंबा नवी मुंबई बाजार समितीत दाखल होत आहे. कर्नाटकातून देखील आंबा दाखल होत असून गुजरातमधून देखील मुंबईच्या बाजार पेठेत आंबा दाखल होतो. गुजरातमधून पुढील महिन्यात आंबा दाखल झाल्यास आंब्याचे दर घसरतील, असं एका व्यापाऱ्यानं सांगितलं.
महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकणासह विविध भागातील शेतकरी आंबा उत्पादन घेत असतात. आंबा उत्पादक पांडुरंग गुळवे यांनी वातावरण वाढू लागल्यानं वेगवान वारे वाहण्याची आणि पावसाची शक्यता असते. त्यामुळं आंबा खराब होण्याची शक्यता असते,त्यामुळं फेब्रुवारी मार्चपासून आंबा बाजारपेठेत दाखल होत असल्याचं गुळवे म्हणाले. गेल्यावर्षी मान्सून लांबल्यानं देवगड हापूस आंबा बाजारात उशिरा दाखल होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तुमच्या कोंबडीहूलला आम्ही भीक घालत नाही; व्हिपवर प्रश्न विचारताच भास्कर जाधवांचा निशाणा