यासंबंधी माहिती अशी की, लोणी येथील तेजस्वनी दिघे बाभळेश्वर येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिची बारावीची परीक्षा सुरू होती. प्रवरानगर येथील केंद्रावर तिचा नंबर आला होता. विज्ञान शाखेचे काही पेपर तिने दिले होते. गेल्या बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर होता. त्या दिवशी सकाळी तिने आणि तिचे आजोबा भीमराज दिघे यांनी रात्रीचे इडली-सांबर खाल्ले.
तिचे आजोबा भीमराज दिघे हे रयत शिक्षण संस्थेमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. रात्रीचे शिळे अन्न खाणे त्यांना चांगलेच महागात पडले. काही वेळातच दोघांनाही त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पोट दुखत असल्याची त्यांची तक्रार होती. मात्र, नेमके निदान होत नव्हते. त्यामुळे त्यांना प्रथम संगमनेरला आणि त्यानंतर पुण्यातील केईएम हॉस्पिटलला हलविण्यात आले.
तेव्हापासून त्यांच्यावर पुण्यातच उपचार सुरू होते. एका बाजूला मृत्यूशी लढाई सुरू होती तर दुसरीकडे बारावीचे उरलेले पेपर बुडत होते. अखेर तेजस्विनी जगण्याची लढाईही हरली. सोमवारी तिचा रुग्णालयातच मृत्यू झाला. तिचे आजोबा मात्र बचावले आहेत.
तेजस्विनी विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेत होती. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी तिने अभ्यासही केला होता. पहिले काही पेपर दिल्यानंतर तिच्यावर हे दुर्दैव ओढावले. त्यात तिचा मृत्यू झाला. तिचे आणि कुटुंबयांचेही स्वप्न भंगले.
इतर पालकांना सोडलं मग आम्हाला का नाही?, मुलांना कॉपी देण्यासाठी पालकांचा परीक्षा केंद्रावर गोंधळ!