रत्नागिरी : मीरा-भाईंदर येथून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार पालकांनी मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तीन अल्पवयीन मुली शेजारी खेळण्याकरता गार्डनमध्ये गेल्या होत्या, मात्र त्या घरी न परतल्याने पालकही घाबरून गेले होते. अखेर या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तपासाची सूत्रं तातडीने फिरवत खेड पोलिसांनी रेल्वे थांबवून या “अपहरण” नाट्याचा छडा लावला. अखेर या तीन अल्पवयीन मुलींना कोकण रेल्वे मार्गावरील मांडवी एक्सप्रेस मधून आज मंगळवारी दुपारी सुखरूप ताब्यात घेतले आहे.

घरी जाण्यास उशीर झाल्याने पालक ओरडतील या भीतीने या तीनही अल्पवयीन मुली कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून निघाल्या होत्या.

07 मार्च 2022 रोजी सकाळी 11:30 वा. मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाकडून खेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे, यांना काशीमीरा पोलीस ठाणे गु.र.नं 173 / 2023 भा.दं. वि.सं. कलम 363 अन्वये गुन्ह्यातील तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असल्याबाबत व त्यांचे वर्तमान स्थान हे “मांडवी एक्सप्रेस” या धावत्या रेल्वेमध्ये असल्याबाबत माहिती देऊन त्यांचा शोध घेण्याबाबत विनंती करण्यात आली.

त्यानुसार, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे, खेड पोलीस ठाणे यांनी आपल्याकडील 2 पोलीस अधिकारी व 8 अंमलदार अशी वेगळी पथके तयार केली व 12:05 वा. खेड रेल्वे स्थानक येथे येणाऱ्या मांडवी एक्सप्रेसच्या तपासणीच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनासोबत समन्वय राखून ही रेल्वे 05 मिनिटे अधिक कालावधी करिता खेड रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली.

होळी सणाच्या निमित्ताने कोकणामध्ये जाण्या येण्यासाठी नागरिक रेल्वेमध्ये अधिक गर्दी करत असतात याची पूर्ण कल्पना तसेच वेळेची मर्यादा असताना देखील या तीनही मुलींचा मांडवी एक्सप्रेसमध्ये कसून शोध घेण्यात आला व अखेरीस या मुली रेल्वेच्या एका बोगीमध्ये बसलेल्या सापडल्या.

या तीनही मुलींना खेड पोलीस ठाणे येथे सुखरूप आणण्यात आले आहे. या मुलींकडे अधिक चौकशी केली असता, “या मुली त्यांचे घरा शेजारील गार्डन मध्ये फिरण्यासाठी गेल्या होत्या व त्यांना घरी जाण्याकरीता उशीर झाल्याने, आपले पालक आपल्याला आता ओरडतील, या भीतीने त्या निघाल्या होत्या.

चोरी रोखण्यासाठी नसता शहाणपणा, ग्रीलला विजेची तार लावली; निष्पाप पोरानं तडफडून जीव गमावला

या तीनही मुलींना खेड पोलीस ठाणे येथे सुखरूप आणण्यात आले आहे. या मुलींकडे अधिक चौकशी केली असता, “या मुली त्यांचे घरा शेजारील गार्डन मध्ये फिरण्यासाठी गेल्या होत्या व त्यांना घरी जाण्याकरीता उशीर झाल्याने, आपले पालक आपल्याला आता ओरडतील, या भीतीने त्या निघाल्या होत्या.

लिंगबदल शस्त्रक्रिया झाली, मित्रासोबत अडीच वर्ष वास्तव्य, पण… मुंबईत महिलेने आयुष्य संपवलं
या तीनही मुलींना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्याकरिता काशीमीरा पोलीस ठाणे येथील पथक खेड पोलीस ठाणे करिता रवाना झाले आहे. ही कारवाई, खेड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सुजीत गडदे तसेच त्यांच्या पथकातील दोन पोलीस अधिकारी व आठ पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या भव्य होळीने सैलानी बाबा यात्रेला सुरुवात

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here