बंडू येवले, म. ‌‌‌‌टा. प्रतिनिधी, लोणावळा :- धुलिवंदनाचा आनंद लुटल्यानंतर हात पाय धुण्यासाठी गेलेल्या एका महाविद्यालयीन युवकाला प्राण गमवावे लागले. इंद्रायणी नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तळेगाव जवळील वराळे गावच्या हद्दीत घडली आहे.

जयदीप पुरुषोत्तम पाटील (वय- २१ वर्ष, रा. तारखेड, पाचोरा जळगाव) असे इंद्रायणी नदी पात्रात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा मित्र शरद शिवाजी राठोड याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये माहिती दिली.

जयदीप हा तळेगाव जवळील आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी संगणक शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होता.

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ७ ते ८ विद्यार्थी धुलिवंदनाचा आनंद लुटत होते. खेळून झाल्यानंतर ते सर्व जण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रात हातपाय धुण्यासाठी गेले होते. यावेळी हातपाय धुताना जयदीप पाटील याचा पाय घसरल्याने तो खोल पाण्यात बुडाला.
जन्मानंतर बाळाने डोळे मिटले, दुसऱ्याच दिवशी आईचाही मृत्यू, गावात एकाही घरात चूल पेटली नाही
यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना त्याला वाचविण्यात अपयश आल्याने अखेर त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

ट्रॅक्टरच्या धडकेत रिक्षा पलटी, दोघा प्रवाशांचा मृत्यू, लग्नाच्या तोंडावर नवरदेवाची एक्झिट
या घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी जयदीपचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना जयदीपचा मृतदेह शोधण्यास यश आले व मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

भर मंचावर शरद पवारांच्या डोळ्यात पाणी, रयत शिक्षण संस्थेची वाटचाल ऐकताना पवार गहिवरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here