नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ असलेल्या पंढरपूरवाडी समोर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर अपघातात एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळ असलेल्या पंढरपुरवाडी समोर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी चारचाकी एसेंट कार क्रमांक (एम.एच. ०४ एफ. ए. ८२९१) ही गाडी भरधाव वेगाने जात असताना गाडीचे पुढील टायर अचानक फुटले. यावेळी कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार थेट डिव्हायडर क्रॉस करून विरुद्ध बाजूला गेली.

अपयशी लोकेश राहुलचे कमबॅक होणार, संघातील कोणत्या खेळाडूची विकेट पडणार जाणून घ्या…
दरम्यान, मुंबईहून नाशिककडे अपघातग्रस्त वॅगनर कार घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅनवर ही एसेंट कार जोरदार आदळली आणि भिषण अपघात होऊन या अपघातात एकाच कुटुंबातील एका लहान मुलीसह एक महिला व दोन पुरुष जागेवरच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. रस्त्यात सर्वत्र गाडीच्या काचा पसरल्या आहेत. एक कुटुंब आपल्या कारमधून मुंबईकडे जात असताना जात नशिबाने त्यांच्यासोबत घात केला आणि काही क्षणातच कुटुंब संपलं आणि होत्याचं नव्हतं झालं.

महामार्गावरच सर्वत्र गाडीच्या काचा आणि रक्तभंबाळ अवस्थेत अपघातग्रस्तांना पाहून अपघातस्थळी असलेल्या नागरिकांच्या अंगाला काटा आला. जखमी असलेल्या अपघातग्रस्ताला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातातील मृतांची नावे अद्याप समजली नसून या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताबा सुटला अन् ४० प्रवाशांसह एसटी पलटली, अपघाताचे फोटो पाहून थरकाप उडेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here