उल्लेखनीय म्हणजे, नजरकैदेत असलेल्या जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री कस्टडी आणखीन तीन महिने वाढवण्यात येत असल्याचं केंद्र सरकारनं शुक्रवारी जाहीर केलंय. सुरक्षा कायद्यांतर्गत केंद्र सरकारकडून मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय. २०१९ साली मधून अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्यानंतर मुफ्ती यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
वाचा :
वाचा :
‘५ ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस नाही. आमच्यासाठी हा दिवस काळा दिवस आहे. गृह मंत्रालयानं माझ्या आईला कैदेत का ठेवलंय, याचं उत्तर मी देऊ शकत नाही. माझ्या आईला कैदेत ठेऊन नागरिकांना एक प्रकारे संदेश दिला जातोय. इथं कुणालाही बोलण्याचा अधिकार नाही’, असं इल्तिजा मुफ्ती यांनी म्हटलंय.
जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ७० हटवण्याविरोधात सामूहिक संघर्षाची गरज आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या कुणीही स्वतंत्र नाही. एक प्रकारचं दहशतीचं वातावरण इथं तयार करण्यात आलंय. अनेक लोक तुरुंगात बंद आहेत. अनुच्छेद ३७० हटवल्यानं दहशतवादी समाप्त होणार नाही, हेच वसीम बारीच्या हत्येतून दिसून येतंय, असंही इल्तिजा यांनी म्हटलंय. आपल्या आईची कैद नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आल्याचं याअगोदर इल्तिजा यांनी ट्विट केलं होतं. मेहबुबा मुफ्ती यांचं ट्विटर अकाऊंट सध्या इल्तिजा यांच्याकडून हाताळलं जातंय.
वाचा :
उल्लेखनीय म्हणजे, ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्याला वर्ष पूर्ण होत असतानाच दुसरीकडे अयोध्येत राम मंदिर भूमी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. सत्ताधारी भाजपचे अनेक नेते या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येतंय.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.