हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनिल बंड यांनी दिलेल्या अंदाजानुसार आज पासून वातावरण कोरडे राहील. पुढील दोन-तीन दिवसात विदर्भात कमाल तापमान ३८-३९° सेल्सिअसच्या जवळ पोहोचण्याची शक्यता आहे. कोकण गोवा भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील. येत्या १४ ते १६ मार्च या कालावधीत विदर्भात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे गहु हरभरा पीकांची कापणी तातडीने पूर्ण करावी. संत्रा बहाराचे वाढीव तापमानापासुन रक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्या, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Home Maharashtra weather alert in maharashtra, शेतकऱ्यांनो ‘या’ तारखेआधी करून घ्या शेतीचे कामे, असा...
weather alert in maharashtra, शेतकऱ्यांनो ‘या’ तारखेआधी करून घ्या शेतीचे कामे, असा आहे हवामान विभागाचा अंदाज – mumbai weather update: imd predicts thunderstorms, unseasonal showers on 14th march
अमरावतीः ऐन पिक काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. पावसामुळं शेतातील गहू, हरभरासह द्राक्षे आणि इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. कोकणासह, मराठवाडा, विदर्भातील पावसामुळं शेतकऱ्यांवर संकट कोसळलं आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.