सांगली : एका भरधाव चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. रस्त्यावर द्राक्षे विकत बसलेल्या महिलेला जागीच प्राण गमवावे लागले. शुभांगी विक्रम जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी येथे कराड-विटा महामार्गावर हा अपघात घडला आहे.

कडेगाव तालुक्यातल्या येवलेवाडी येथील कराड-विटा या राष्ट्रीय महामार्गावर द्राक्ष विकणाऱ्या शुभांगी विक्रम जाधव (वय ३५ वर्ष) या महिलेचा भरधाव चारचाकी गाडीने उडवल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातामध्ये शुभांगी जाधव यांचे पती विक्रम जाधव (वय ३७ वर्ष), शरद महादेव जाधव (वय ४१ वर्ष) आणि मुकुंद शेवाळे (वय ३० वर्ष) राहणार सर्व येवलेवाडी, हे तिघे जण जखमी झाले आहेत.

या प्रकरणी गाडी चालक राजेंद्र घार्गे (वय ५९ वर्ष, रा. उपळी मायणी) यांच्या विरोधात चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती याप्रमाणे येवलेवाडी या ठिकाणी राहणाऱ्या शुभांगी जाधव व त्यांचे पती विक्रम जाधव हे दोघेही पती-पत्नी द्राक्ष विक्री आणि वडापाव व्यवसाय करतात. बुधवारी जाधव दापत्य द्राक्ष विक्रीसाठी रस्त्यावर बसले होते, यावेळी शरद जाधव हे आपल्या दुचाकीवरून द्राक्ष खरेदी करण्यासाठी आले होते आणि ते आपली दुचाकी लावून द्राक्ष खरेदी करत होते.

मद्यपानासह व्हायग्राच्या दोन गोळ्या, नागपुरातील लॉजवर तरुणाचा मृत्यू, नेमकं कारण समोर
याच वेळी राजेंद्र घार्गे यांची चारचाकी गाडी भरधाव आली आणि त्याने थेट शुभांगी जाधव यांना पहिल्यांदा उडवले, त्यानंतर विक्रम जाधव आणि शरद जाधव यांना देखील उडवले, मग जरा पुढे जाऊन दुचाकीवर थांबलेल्या मुकुंद शेवाळे या तरुणाला देखील उडवले.

सहा दिवसांपूर्वी दुसरं लग्न, २६ वर्षीय गे पार्टनरकडून हत्या, बिझनेसमनच्या खुनाचं गूढ उकललं
या भीषण अपघातामध्ये शुभांगी जाधव जागीच ठार झाल्या. तर अन्य तीन जण हे जखमी झाले. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघात प्रकरणी राजेंद्र घार्गे यांच्या विरोधात दाखल झाला असून अधिक तपास चिंचणी-वांगी पोलीस करत आहेत.

केंद्रीय मंत्र्यांचं भाषण संपलं अन् मंडप थेट कोसळला; घटनेत अनेक महिला जखमी, तर कार्यक्रम अर्ध्यावर गुंडाळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here