आंदोलन अर्धवट सोडतात, असा दावा करतात. एक आंदोलन दाखवा जे मी अर्धवट सोडलं. सगळ्या जबाबदाऱ्या आमच्याच आहेत का? ज्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील ६५ ते ७० टोलनाके बंद झाले. शिवसेना-भाजप जे अडीच वर्षांपूर्वी गळ्यात गळे घालून फिरत होते, त्यांनी जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती, त्यांना कोणी का नाही विचारत. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, असं राज ठाकरे म्हणाले.
शिवाजी पार्क परिसरात हल्ला झालेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनाही राज ठाकरेंनी मंचावर पाचारण केलं. आत्मचरित्राची चार पानं वाढली.. ज्याने केलंय, त्यांना पहिलं समजेल की हे त्यांनी केलंय, मग सगळ्यांना कळेल की हे त्यांनी केलंय. माझ्या मुलांचं रक्त मी वाया घालवू देणार नाही, महाराष्ट्रासाठी काम करायला आले आहेत, असल्या फडतूस लोकांसाठी नाही, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला.
राज ठाकरेंसाठी साॅफ्ट काॅनर्र अन् बाळासाहेबांचा लाभलेला सहवास; रवींद्र धंगेकर भरभरून बोलले
सुरुवातीलाच किस्सा
राज ठाकरे यांच्या नावाआधी लांबलचक घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांवरुन राज ठाकरेंनी एक किस्सा सांगितला. शिवचरित्रकार दत्ता वामन पोतदार रायगडावर गेले होते. त्यांनी एका शेतकऱ्याला विचारलं पाऊस पडेल काय, तर तो म्हणाला वाटत नाही. पण थोड्याच वेळात ढग दाटून आले, जोराचा वारा आला आणि पाऊस पडू लागला. त्यांनी एका झोपडीवर टकटक केली. आतून आवाज आला, कोण आहे, ते म्हणाले. शिवचरित्रकार महामहोपाध्याय दत्ता वामन पोतदार. तर आतून उत्तर आलं, की इतक्या लोकांना जागा नाही. असं माझ्या बाबतीत झालं, मी कुठल्या झोपडीवर टकटक केली, आणि यांनी अशा घोषणा दिल्या, तर घेतील का मला घरात? अशा विनोदाने राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली.