मुंबई : वांद्य्रातील ४० फूट उंच उड्डाणपुलावरुन थेट खाली कोसळल्यामुळे बाईकवर पाठीमागे बसलेल्या १८ वर्षीय तरुणाला प्राण गमवावे लागले, तर अल्पवयीन बाईकचालक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांना चुकवण्याच्या नादात यूटर्न घेतल्याने बाईकवरील नियंत्रण सुटून दोघं खाली रस्त्यावर पडल्याची माहिती आहे. अब्दुल अहद शेख (१८ वर्ष) याचा अपघातात मृत्यू झाला. बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

१७ वर्षीय बाईक चालक बेशुद्ध असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भरधाव वेगात बाईक चालवत होते आणि दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. जेव्हा बाईकचालकाने पुलावर पोलिसांना पाहिलं, तेव्हा त्याने अचानक यू-टर्न घेतला, त्याच वेळी नियंत्रण गमावून त्यांची बाईक पुलाच्या रेलिंगवर आदळली आणि दोघेही रस्त्यावर खाली फेकले गेले. बाईकस्वाराच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंगळवारी संध्याकाळी धुलिवंदन आणि “बडी रात” या इस्लाम धर्मीयांच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर बाईकस्वारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस पश्चिम द्रुतगती महामार्गावर सी लिंकच्या दिशेने गस्त घालत होते. बुधवारी पहाटे दोघे बाईकस्वार वांद्रे येथील उड्डाणपुलावरून गेले.
बाईक चालक तरुण अल्पवयीन असल्याने पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात, अर्टिगा शिवशाहीवर धडकली, सुप्रसिद्ध निवेदकाचा जागीच मृत्यू
या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अल्पवयीन तरुण वैध परवान्याशिवाय बाईक चालवत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हळदीच्या दिवशी ‘नवरी’ प्रियकरासह पळाली, फिनेल पिऊन पोलिसात गेली, विदर्भात खळबळ
पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, बाईकस्वाराने पोलिसांना पाहून एसव्ही रोडकडे जाण्यासाठी त्वरित उजवीकडे वळण घेतल्याने हा अपघात झाला. त्याने आपत्कालीन ब्रेक दाबल्याने बाईक घसरली, त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले.

अजित दादांनी दिवसभर फिल्डिंग लावली, फडणवीसांनी एक फोन केला आणि रात्रीत कार्यक्रम झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here