बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील चनई मधून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला. पवन रामराव गोचडे याचा कळंब पोलीस ठाणे हद्दीत मांजरा नदीच्या पाण्यात पवन मृतावस्थेत आढळून आला आहे.

अंबाजोगाई जवळील चनई येथून पवन रामराव गोचडे हा दोन दिवसांपासून बेपत्ता झाला होता. या बाबत त्याच्या नातेवाईकांनी ८ मार्च रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती.

दरम्यान ९ मार्च रोजी दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास मासे धरणाऱ्या लोकांना केज-कळंब रस्त्यावरील मांजरा नदीच्या पुलाजवळ प्रेत तरंगत असताना आढळून आले. कळंब पोलिसांनी सदर प्रेत पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटविण्यासाठी अंबाजोगाई पोलिसांच्या मदतीने बेपत्ता युवकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यावेळी हा मृतदेह पवन गोचडे याचा असल्याची ओळख पटली असून सदर मृतदेह हा चनई ता. अंबाजोगाई येथील पवन रामराव गोचडे वय २७ वर्ष याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पिंगनवाड, पोलीस नाईक कोळेकर, पोलीस नाईक गायकवाड यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवीला आहे.

रात्रीचं इडली सांबार जीवावर बेतलं, नगरमधील बारावीच्या विद्यार्थिनीचा विषबाधेने मृत्यू

मयताची रिक्षा मांजरा पुलावर आढळल्याने पोलिसांना संशय होताय चनई ता अंबाजोगाई येथून बेपत्ता असलेला युवक पवन गोचडे याची रिक्षा ८ मार्च रोजी बेवारस स्थितीत आढळून आला होता.

मद्यपानासह व्हायग्राच्या दोन गोळ्या, नागपुरातील लॉजवर तरुणाचा मृत्यू, नेमकं कारण समोर

मयत पवन गोचडे याच्या प्रेताची ओळख पटविणाऱ्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून पवनचा घात झाला असावा असा संशय पोलीस अधिकाऱ्याकडे व्यक्त केला आहे.

इतर पालकांना सोडलं मग आम्हाला का नाही?, मुलांना कॉपी देण्यासाठी पालकांचा परीक्षा केंद्रावर गोंधळ!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here