‘आता बिहारचा मुलगा सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्युच्या चौकशीसाठी आलेल्या बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळत नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर कॉंग्रेसचा वरदहस्त असलेल्या बॉलिवूड माफियांचा दबाव आहे. त्यामुळे सुशांत प्रकरणात जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांना वाचवण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. काँग्रेस बिहारच्या जनतेला काँग्रेस काय तोंड दाखवेल?, असा आरोप सुशीलकुमार मोदींनी केलाय.
‘नवोदित अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या कथित आत्महत्येमुळे कोट्यावधी बिहारी नागरिकांना धक्का बसला आहे आणि दुःखी आहेत. यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी सर्वपक्षाची मागणी आहे. बिहार सरकारने केवळ चौकशीचे आदेशच दिले नाहीत, तर सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलीय. आणि रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी करताना बिहार सरकारची बाजूही समजूनही घ्यावी अशी विनंती केली गेलीय, असं सुशीलकुमार मोदी म्हणाले.
सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्व प्रयत्न करेल. महाराष्ट्रात पूर्वीही बिहारच्या नागरिकांशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी येत होत्या. पण आता महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्यांवर चालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव सरकारेंच्या सरकारने मर्यादा ओलांडल्या आहेत. लॉकडाउनच्या काळातही महाराष्ट्रातून बिहारला येणाऱ्यासाठी निघालेल्या मजुरांना अडकाठी केली जात होती, असा आरोप सुशीलकुमार मोदींनी केलाय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.