चंदिगडः पंजाबमध्ये विषारी दारू पिऊन मरण पावलेल्या नागरिकांची संख्या ८६ झाली आहे. एकट्या तारन जिल्ह्यात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमृतसरमध्ये १२ आणि गुरदासपूरच्या बटाला येथे ९ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात तरन तारनच्या एसएसपींनी कारवाई करत दोन पोलिस ठाण्यांचे प्रभारी आणि एका डीएसपीला निलंबित केले आहे. अंमली पदार्थांचा अवैध व्यवहार करणाऱ्या माफियांशी या अधिकाऱ्यांचा संबंध आहे का? याची चौकशी पोलिस करत आहेत. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाखा रुपयंची मदत जाहीर केली आहे. तर उत्पादन शुल्क विभागातील ७ अधिकारी, २ पोलीस उपअधीक्षक आणि ४ एसएचओंना निलंबित केलं आहे. तसंच त्यांची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.

तरन तारनमधील मृतांची संख्या ४२ वर गेली आहे. जिल्ह्यातील सदर आणि शहरी भागात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. बुधवारी रात्रीपासून तरण तरण व्यतिरिक्त, अमृतसरमध्ये 11 आणि बटालाच्या गुरदासपूर येथे ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, पोलिस उपायुक्त कुलवंत सिंह यांनी शनिवारी दिली.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी यापूर्वीच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी एसआयटीही तयार केली गेली आहे. ही एसआयटी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल. विषारी दारू बनवणाऱ्या आणि पुरवठा करणाऱ्यांना लवकरच अटक केली जाईल, असं पंजाब सरकारने म्हटलंय.

या प्रकरणातील आरोपी लवकरच तुरूंगात असतील. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. फरार आरोपींना पकडण्यासाठी सर्व भागात छापेमारी सुरू आहे, असं पंजाबचे बॉर्डर रेंजचे डीआयजी हरदयालसिंग मान यांनी सांगितलं.

संपूर्ण भागात दारूचा अवैध व्यवसाय सुरू आहे. यामुळे ही बनावट दारू सतत गावात पुरवली जात होती. यामुळे अनेकांचा जीव गेला आहे. बेकायदेशीर दारू बनवण्याचा आणि पुरवठा करण्याच्या धंद्यावर पोलिस नियंत्रण आणू शकलेले नाहीत, असा आरोप तरन तारनमधील मद्य विक्रेत्यांनी केला आहे.

तरन तारन या गावात अतिशय वाईट स्थिती झाली आहे. गावकरी एखाद्याचा अंत्यसंस्कार करून परत येईपर्यंत आणखी दोन-तीन मृत्यू झालेले असतात. अनेक गावांमध्ये गेल्या ३६ तासांपासून चूलही पेटलेली नाही.

पीडित व्यक्तींचे कुटुंबीय जबाब नोंदवण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीएत. परंतु, सहकार्य करण्यासाठी पोलिस त्यांना आवाहन करत आहेत. पोलीस कारवाई करण्याची त्यांची इच्छा नाही. काहीजण तर पोस्टमॉर्टमदेखील करू देत नाहीएत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पोलिसांना माहिती न देताच काही कुटुंबीयांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार केलेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अमृतसर आणि बटाला येथे ८ जणांना आणि तरन तारनमधील १० जणांना अटक केली आहे, असं तरन तारनचे उपायुक्त कुलवंत सिंह म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here