हैदराबाद : भारतात अजूनही अनेक रुढी आणि परंपरांचं पालन केलं जातं. काही प्रथा कायद्यानं बंद करण्यात आलेल्या आहेत. काही समाजामध्ये वरपक्षाकडून नववधूला हुंडा देण्याची पद्धत अजूनही पाळली जाते. अपेक्षेप्रमाणं हुंडा न मिळाल्यानं नववधूनं लग्न मोडल्याची घटना घडली आहे. लग्न लागण्यापूर्वीचं नववधूच्या निर्णयामुळं आलेल्या वरपक्षाला मोकळ्या हातानं परत जावं लागलं. नवऱ्या मुलाकडील मंडळींनी लग्नासाठी नवरीच्या घरच्यांना हुंड्यापोटी २ लाख रुपये दिले होते. मात्र, आणखी पैशांची मागणी ऐनवेळी करण्यात आली आणि लग्न मोडण्यात आलं.

गुरुवारी लग्न सोहळा तेलंगणाच्या घटकेसरमध्ये पार पडणार होता. नववधूकडील मंडळी कोठागुडेम मधील भद्राद्रीमधून लग्नासाठी दाखल झाली होती. लग्नासाठी हॉल सजवण्यात आलेला. वऱ्हाडी मंडळी मुहूर्त जवळ येण्याची वाट बघत होती. मात्र, नववधू लग्नाच्या ठिकाणी आलीच नाही. तिनं आणि तिच्या कुटुंबीयांनी एका हॉटेलमध्ये जाऊन थांबण्याचा निर्णय घेतला.

यानंतर वरपक्षाकडील मंडळी हॉटेलवर गेली त्यांनी वधूपक्षाला लग्नाच्या ठिकाणी न येण्याचं कारण विचारलं. त्यावेळी वधूपक्षाकडून आणखी पैशांची मागणी हुंडा म्हणून करण्यात आली. या मागणीमुळं वरपक्षाच्या पायाखालची जमीन सरकली.

किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा झटका, मुश्रीफांवर यंत्रणांचं धाडसत्र सुरुच, ईडी कागलमध्ये, नेमकं प्रकरण काय ?

या सर्व प्रकाराची माहिती मिळताच वरपक्षानं लग्नमंडपातून काढता पाय घेतला आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी यानंतर वधूच्या कुटुबीयांना बोलावणं पाठवलं. पोलिसांसमक्ष दोन्ही कुटुबांमध्ये चर्चा झाली. दोन्ही कुटुंबांनी लग्न मोडलं.

पोलिसांनी याविषयी टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीशी बोलताना अधिक माहिती दिली. मुलीलाच त्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं, त्यामुळं तिनं अधिक पैशांची मागणी केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Fih Hockey Pro League: आपण बघत बसलोय क्रिकेट, तिकडे हॉकी संघाने केला जगज्जेत्याचा पराभव

लग्नाच्या निमित्तानं नववधूच्या घरच्यांना २ लाख रुपयांचा हुंडा मिळाला होता. मात्र, नववधूला लग्न करायचं नसल्यानं २ लाख रुपये वरपक्षाला माघारी देण्यात आले. दोन्ही कुटुंब लग्न न लागताच परतली.

दरम्यान, भारतात नवरी मुलगी किंवा तिच्या वडिलांकडून हुंडा घेण्यावर कायद्यानं बंदी आहे. नवविवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं. सामाजिक संघटना आणि महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या स्त्री मुक्तीच्या चळवळींनी आंदोलनं केल्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा अंमलात आला.

आम्हाला अजून किती त्रास देणार, गोळ्या मारून संपवून टाका; मुश्रीफांच्या पत्नीने फोडला टाहो

मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस, भरपावसात वीज कोसळली अन् नारळाचं झाड पेटू लागलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here