सतीश कुमार आणि त्याची पत्नी काजल तीन मुलांसह एका झोपडीमध्ये झोपले होते. रात्रीच्या सुमारास अचानक झोपडीच्या छपराला आग लागली आणि आक्रोश सुरू झाला. यानंतर गावातील लोकांनी तातडीने घटनास्थळी जात आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीनं रौद्ररुप धारण केलं होतं, त्यात पती-पत्नीसह तीन मुलांचा भाजल्यानं मृत्यू झाला.
सतीश कुमारच्या आईने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र मात्र त्या देखील गंभीरित्या भाजल्या असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे
याच गावातील रहिवासी उदयपाल यांनी या घटनेबद्दल बोलताना सांगितले की सतीश त्याच्या पत्नीसह आणि तीन मुलांसह घरात झोपलेला असताना छपरावर असलेल्या बल्बमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली.
पोलीस अधीक्षक बीबीजीएस मूर्ती यांनी सांगितले की सतीश आणि त्याची पत्नी काजल यांच्यासह त्यांच्या तीन मुलं मुलांचा जळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीमच्या अधिकाऱ्यांचंसह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं झालं होतं.
जिल्हाधिकारी नेहा जैन यांनी जखमी असलेल्या वयस्कर महिलेची जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. रुग्णालयातील डॉक्टरांना त्यांनी संबंधित महिलेवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले. आग कशामुळे लागली याचा तपास करण्याचे आदेश दिल्याचं नेहा जैन यांनी सांगितले आहे. या घटनेमुळं गावावर शोककळा पसरली.
होळीच्या दिवशी सर्वांसोबत फोटो काढले अन्…; सतीश कौशिक यांनी केलेली ती पोस्ट शेवटची ठरली