शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून २००९ साली रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे पराभूत झाले होते. मात्र त्यांना पुन्हा शिर्डी लोकसभेचे वेध लागले असून पुन्हा लोकसभा लढण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवलीये. रविवारी शिर्डीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभूत झालो. मात्र मला पुन्हा लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डी लोकसभा लढणार असून मतदारसंघाच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करेन,असं आठवले म्हणाले.

खासदार लोखंडेंचं टेन्शन वाढणार?

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. केंद्रात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे. तसेच राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती असून खासदार लोखंडे युतीकडून विद्यमान खासदार आहे. रामदास आठवलेंच्या वक्तव्याने आगामी लोकसभेत तिकीट वाटपावरून पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र आठवलेंच्या इच्छेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे टेन्शन वाढणार असल्याची चर्चा आहे.

मतं फोडली, अध्यक्षपद खेचून आणलं, ‘किंगमेकर’ कर्डिलेंना फडणवीसांकडून शाबासकीची थाप
एकट्याला मंत्री करून मी समाधानी नाही

शिर्डीत रिपब्लिकन पक्षाचे भव्य अधिवेशन होणार असून मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहे. नागालॅंड सारख्या प्रदेशात रिपाईंचे आमदार निवडून आलेत. महाराष्ट्रात का निवडून येऊ शकत नाही यावर विचार मंथन होणार आहे. मला एकट्याला मंत्री करून मी समाधानी नाही. पक्षातील इतरांनाही संधी मिळावी. दोन ते तीन महामंडळे मिळावी, असा प्रस्ताव सरकार पुढे ठेवला असल्याचं आठवलेंनी सांगितलं.

लोकसभेला ३ जागा आणि विधानसभेला १५ जागा द्या

मंत्रीमंडळ विस्तार लवकरात लवकर व्हावा. आरपीआयला एक मंत्रीपद दिलं जावं. राज्यपाल नियुक्त आमदारात आरपीआयला एक जागा मिळावी. महाराष्ट्रात एकट्याच्या बळावर निवडून येणे अशक्य आहे. मित्र पक्षाने आम्हाला सहकार्य करावं. येत्या लोकसभा निवडणुकीत तीन जागा आणि विधानसभेत १५ जागा आरपीआयला मिळाव्यात. या विषयी आमची भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे. सर्व समाजातील लोकांना संधी देण्याचा मानस आहे. ज्या जागा निवडून येतील तिथे काम करण्याचा प्रयत्न असेल. देशपातळीवर पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केवळ फोटो काढण्यासाठी गर्दी नकोय. कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, असं आवाहन आठवलेंनी केलं.

‘संभाजीनगर’वरुन आंदोलन करणाऱ्या MIM कार्यकर्त्यांना फडणवीसांनी ठणकावलं
आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल

राज्यातील सरकार पडणार, अशा चर्चा सुरु आहेत. आपलं काय मत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना आठवले म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार पडणार अशा अफवा आहेत. मात्र आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. येत्या निवडणुकीतही आम्ही सर्व एकत्र येऊन लढणार आणि विजयी होणार असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here