पुणे : भामा आसखेड धरण परिसरात मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या एका ३४ वर्षीय युवकाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील करंजविहीरे येथे घडला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दत्ता वसंत भारती (रा. लक्ष्मी रोड, भारती मठ, वाशी, जि. धाराशिव) असं बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याबाबत गजानन लक्ष्मण भारती यांनी महाळुंगे पोलिसांना माहिती दिली. भारती यांच्या आकस्मिक जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता हा काल रोजी त्याच्या तीन मित्रांसोबत भामा आसखेड धरणाच्या बंधाऱ्याजवळ असणाऱ्या जलसाठा परिसरात पार्टी करण्यासाठी आला होता. त्यावेळी हे तिघे मित्र पार्टी करत होते. त्यावेळी दत्ताचा पाण्यात तोल गेला आणि तो पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला. मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. मात्र, दत्ता तोपर्यंत बुडाला होता. आज रविवारी सकाळी अकराच्या सुमारास मावळ तालुक्यातील वन्यजीव रक्षक संस्थेच्या कार्यकर्त्यांना मृतदेह शोधण्यासाठी पाचारण करण्यात आले. पोलिसही यावेळी घटनास्थळी दाखल झाले होते. रेस्क्यू टीमने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर संबधित युवकाचा मृतदेह बाहेर काढला.

जुन्या पेन्शनच्या मोर्चात जाऊन आर आर आबांच्या लेकाची डरकाळी, शिंदे फडणवीसांना ठणकावलं
या कामगिरीत वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि आपदा मित्र संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, भास्कर माळी, गणेश गायकवाड, शुभम काकडे, विनय सावंत, विकी दौंडकर, जिगर सोलंकी, सत्यम सावंत, सचिन वाडेकर, श्रीयश भेगडे, अनिश गराडे, सार्थक घुले, गणेश सोंडेकर, कमल परदेशी, शांताराम गाडे, श्रीकांत बिरदवडे, सचिन भोपे, नितीन गाडे, पोलिस पाटील सचिन मरगज, विक्रांत चौधरी आदींनी मदत केली.

Oscar 2023: ‘नाटू नाटू’वर लाइव्ह परफॉर्मन्स ते दीपिकाची धमाल! कुठे आणि कधी पाहता येईल सोहळा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here