मुंबई: धुलिवंदनाच्या दिवशी मृतावस्थेत आढळून आलेल्या मुंबईतील जोडप्याच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे. दाम्पत्य घटनेच्या आधी सहा तास गायब होतं, ते नेमकं कुठे गेलं होतं याचा शोध पंत नगर पोलीस घेत होते. मात्र आता पोलिसांनी सहा तासांचा विषय फेटाळला आहे. जुहूतील होळी पार्टीनंतर दिपक शाह (४४) आणि टिना शाह (३९) लगेचच त्यांच्या घरी पोहोचले, अशी माहिती समोर आली होती.

धुलिवंदनाच्या दिवशी (मंगळवारी) दुपारी साडे तीन वाजता शाह दाम्पत्य त्यांच्या घरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असलेल्या छेडा नगर जंक्शनवर दिसलं होतं. मात्र त्यानंतर रात्री साडे नऊ वाजेपर्यंत त्यांच्या ठावठिकाण्याबद्दल काहीच स्पष्टता नव्हती. या ६ तासांच्या अवधीत शाह दाम्पत्य कुठे होतं, याचा शोध पोलीस घेत होते. शाह दाम्पत्य रात्री साडे नऊ वाजता सोसायटीत आलं, अशी माहिती इमारतीच्या वॉचमननं दिली होती.
पहाटेच्या सुमारास डेपोतील बस पेटली; कंडक्टरचा होरपळून अंत, सवय जीवावर बेतली
या प्रकरणाच्या तपासात आता वेगळीच माहिती समोर आली आहे. वॉचमननं दिलेली माहिती अपुरी असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवीदत्त सावंत यांनी सांगितलं. ‘इमारतीच्या परिसरात आणि आतमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासण्यात आली आहेत. शाह दाम्पत्य संध्याकाळी ४ वाजताच दुचाकीवरून इमारतीत आल्याचं त्यात दिसून आलं आहे. त्यानंतरही ते आत येताना दिसले,’ असं सावंत म्हणाले.

साक्षीदारांनी दिलेल्या जबानीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज, कॉल डेटा रेकॉर्ड्स आणि टॉवर लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना सीडीआर आणि टॉवर लोकेशन सापडलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
तो हेतू नव्हता, माफी मागते! होळीला गैरवर्तन सहन करणारी जपानी तरुणी भारताबद्दल काय म्हणाली?
शाह दाम्पत्याच्या मृत्यूमागचं कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू असल्याचं परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितलं. याबद्दलचे सर्व तर्कवितर्क त्यांनी फेटाळून लावले. ‘शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे फॉरेन्सिक अहवालातून मृ्त्यूचं नेमकं कारण कळू शकेल,’ असं कराड म्हणाले. दाम्पत्याचा व्हिसेरा, टिश्यूज कलिना फॉरेन्सिक प्रयोगशाळेला पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here