मुंबई: आत्महत्या प्रकरणातून लॉकडाऊनमध्येही होत असल्याचं उघडकीस आलं आहे. या पार्ट्यांमागचा बोलविता धनी कोण आहे? यामागे मंत्री आहेत की अधिकारी? या संपूर्णप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपे आमदार अॅड. यांनी केली. शेलार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या दिशेने सूचक इशारा केला आहे. मात्र सरकारमधील मंत्र्याचं त्यांनी थेट नाव घेतलेलं नाही. त्यामुळे सरकारमधील हा मंत्री कोण? असा सवाल केला जात आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करून मोजकंच पण सूचक ट्विट केलं आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात वारंवार सेलिब्रिटी पार्ट्यांचा उल्लेख होतोय. लॉकडाऊनमध्ये सामान्य माणसाला आईच्या अंत्यसंस्कारालाही जाण्याची मुभा नव्हती, अशा वेळी सेलिब्रिटी पार्ट्या कुणाच्या आशीर्वादाने सुरू होत्या? मंत्र्यांच्या? की अधिकाऱ्यांच्या?, असा सवाल करतानाच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. शेलार यांच्या या ट्विटमुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुशांतसिंह प्रकरणावरून राजकारण करणाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झापले होते. ज्यांच्या कुणाकडे या प्रकरणाचे पुरावे असतील तर त्यांनी मुंबई पोलिसांकडे पुरावे द्यावेत आणि त्यांना सहकार्य करावं. मुंबई पोलिसांच्या प्रामाणिकपणावर संशय घेऊ नये, असं सांगतानाच या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम असून हे प्रकरण सीबीआयकडे दिलं जाणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावर सुशांतची केस लढणारे वकील विकास सिंह यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना कायद्याची समज नाही. त्यामुळे ते असे वक्तव्य करत असल्याचं सिंह यांनी म्हटलं आहे. हे गुन्हेगारी प्रकरण आहे. त्यामुळे फिर्यादी पक्षाने तक्रार करायची नसून सत्य बाहेर आणायचं असतं. मुंबई पोलीस योग्य पद्धतीने तपास करू शकली नाही. सुशांतच्या आसपास असणाऱ्या व्यक्तिंचाही तपास करण्यात आलेला नाही. आता हे काम बिहार पोलीसच पूर्ण करेल, असं सिंह म्हणाले.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलीस मुंबईत आली आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी पटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर तातडीने बिहारची टीम मुंबईत पोहोचली. साधारणपणे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आलेल्या पोलिसांना स्थानिक पोलिसांकडून मदत केली जाते. मात्र, बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांकडून कोणतंही सहकार्य मिळत नसल्याचं दिसून आलं आहे. बिहार पोलिसांना सुशांतसिंह प्रकरणातील संबंधितांचे जबाब घेण्यासाठी गाडीही देण्यात आली नाही. त्यामुळे या पोलिसांना रिक्षा किंवा टॅक्सीने फिरावं लागत आहे. अंकिता लोखंडेच्या घरी जाण्यासाठी तर बिहार पोलिसांना ३ किलोमीटरची पायपीट करावी लागली. ही माहिती मिळाल्यानंतर जबाब नोंदवून झाल्यावर अंकिताने पोलिसांना स्वत:ची जॅग्वार कार दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here