बीड: बीड जिल्ह्यात सध्या अल्पवयीन विवाह मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत आणि हे विवाह रोखण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर मोठी यंत्रणा सज्ज झाली आहे. अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता एखाद्या अल्पवयीन मुलीच्या विवाह सामील होणाऱ्या फोटोग्राफर, भटजी, आचारी, बँड वाले यासह नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील बालविवाहाचा आलेख सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या गोष्टी रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक पद्धतीने समाज प्रबोधन केले. मात्र अनेक आई-वडील त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपल्या अल्पवयीन मुलींचे लग्न लावत आहेत. यामध्ये अनेक मोठ्या प्रतिष्ठीत घरातील लोकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एक मोठे आणि कठोर पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे.

IPLमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली; द्रविड यांनीही चिंता व्यक्त केली, तर रोहित म्हणाला…
परळी तालुक्यातील नंदागौल गावात एका अल्पवयीन मुलीचा दहावीचा पेपर बुडवून तिचा विवाह लावण्यात आल्याची घटना काल सोमवारी उघडकीस आली होती. या विवाहाची माहिती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना कळताच त्यांच्या आदेशावरून नवरदेव, नवरदेवाचे आई-वडील, नवरीचे आई-वडील दोघांचे मामा यांच्यासह फोटोग्राफर, लग्न लावणारे पंडित, स्वयंपाक करणारे आचारी यासह बँडवाले आणि प्रमुख १३ जणांसह १५० ते २०० वराडींवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ९,१०, ११ बालविवाह प्रतिबंधक अधिनियम १९२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thank You ‘केन मामा’! भारताला पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी देणारा स्टार
प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता एखाद्या विवाहाला जायचे असेल तर फोटोग्राफर, भटजी, बँड आणि आचारी यांना मुलीचे वय आणि विवाह अल्पवयीन आहे की नाही याची माहिती करणे गरजेचे ठरणार आहे. अन्यथा मुला-मुलीच्या आई-वडीलासह लग्नात सहभागी झालेल्या सर्वांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. या निर्णयानुसार आता बालविवाहमध्ये जायचे की नाही याचा विचार करावा लागणार आहे. अशा पद्धतीने कुठे ही बालविवाह होत असेल तर शासनाच्या टोल फ्री क्रमांकावर त्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here