हरदीप सिंह डंग हे रविवारी एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी गायींच्या संदर्भात विधानसभेत आवाज उठवल्याचं सांगितलं. सरकारी कर्मचाऱ्यांच्या दर महिन्याच्या पगारातून काही रक्कम कपात करण्यात यावी, गोशाळांची स्थापना करण्यात यावी आणि निवडणूक लढवण्यासाठी गोपालन बंधनकारक करण्यात यावं, त्याशिवाय गोपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच जमीन खरेदी विक्रीचा अधिकार देण्यात यावा, अशा मागण्या केल्याचं हरदीप सिंह डंग यांनी म्हटलं. मी स्वत: गोपालक असल्याचं डंग म्हणाले. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रविवारी रतलाम जिल्ह्यातील जावरा तालुक्यातील सेमलिया डोंगरावर आयोजित कार्यक्रमात हरदीप सिंह डंग यांनी गोमाता की जय म्हणलं काम संपलं असं अनेकांना वाटतं, असं हरदीप सिंह डंग म्हणाले.
गोशाळा उघडल्या जाव्यात, अशी मागणी केल्याचं हरदीप सिंह डंग म्हणाले. तीन हजार गोशाळांच्या उभारणीचा प्रस्ताव असल्याचं डंग म्हणाले.
ज्यांना २५ हजारांपेक्षा जास्त पगार मिळतो त्यांच्या पगारातून ५०० रुपयांची कपात करण्यात यावी आणि ते गोशाळेत जमा करण्यात यावेत. शेतकरी गायीचं पालन करत असेल तरच जमीन खरेदी आणि विक्री केली जावी, असं हरदीप सिंह डंग म्हणाले.
जे राजकीय नेते आहेत त्यांना सरपंच म्हणून निवडणूक लढवायची असेल किंवा लोकसभेची निवडणूक लढवायची असेल जो गायीचं पालन करेल त्यांनाच निवडणूक लढवण्याची परवागनी द्यावी, अन्यथा त्यांचा अर्ज बाद करण्यात यावा, असं हरदीप सिंह डंग म्हणाले.