भाजपच्या सूत्रांच्या आधारे मीडियात आलेल्या रिपोर्टनुसार २६ पैकी २२ खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे भाजप काही आमदारांना लोकसभेचे तिकीट देण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना देखील उमेदवारी मिळू शकते. काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना देखील लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय आणि पुरुषोत्तम रूपाला यांना देखील यावेळी लोकसभा निवडणूक लढवावी लागेल अशी शक्यता आहे. सध्या दोघे देखील राज्यसभेत आहेत. भाजप दोघांनाही पुन्हा राज्यसभेत संधी देण्याची शक्यता कमी आहे.
भाजपनं नगरपालिकेतील नाराजी दूर करण्यासाठी एकदा सर्व नगरसेवकांची तिकीटं कापली होती. तो फॉर्मुला यशस्वी ठरला होता त्यानंतर भाजपने पुढील सर्व निवडणुकांमध्ये मोहरीतील धोरण राबवला आहे त्यांची कामगिरी चांगली नसेल त्यांना भाजपमध्ये उमेदवारी दिली जात नाही.
कुणाचा पत्ता कट होणार?
पूनम माडम (जामनगर), रमेश धडुक (पोरबंदर), मोहन कुंडारिया (राजकोट), महेंद्र मुंजपुरा (सुरेंद्र नगर), डॉ. किरीट सोलंकी (अहमदाबाद पश्चिम), हसमुख पटेल (अहमदाबाद पूर्व), शरदाबेन पटेल (मेहसाणा), भारतजी डाभी (पाटन), दीप सिंह राठोड (साबरकांठा), परबत पटेल (बनासकांठा), दर्शना जरदोश (सूरत), प्रभु वसावा (बारडोली), केसी पटेल (वलसाड), रंजनबेन भट्ट (वडोदरा), जसवंत सिंह भाभोर (दाहोद), रतनसिंह राठोड (पंचमहाल), देबू सिंह चौहान (खेडा), राजेश चुडासमा (जुनागढ), नारण कछडिया (अमरेली) मितेश पटेल (आणंद) यांची आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी धोक्यात असल्याच्या चर्चा आहेत. तर, अमित शाह, सी. आर. पाटील यांच्यासह अन्य दोन खासदारांना पुन्हा तिकीट मिळू शकतं.