सोलापूर: मंद्रुप हद्दीतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर एमआयडीसीची बोजा चढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतजमिनीच्या उताऱ्यावरून एमआयडीसीचे नाव कमी व्हावे अशी प्रमुख मागणी करत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप हद्दीतील जवळपास १५० शेतकरी हे आपल्या लेकरांबाळांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वर्षा बंगल्याकडे रवाना झाले आहेत.

बैलगाडी घेऊन शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे. शिंदे सरकार असू दे किंवा महाविकास आघाडी सरकार असू दे, आम्हाला कोणीही न्याय देत नाही, गेल्या चार वर्षांपासून मागणी करत आहोत. तरीही शेतजमिनीवरील बोजा कमी होत नाही, अशी खंत यावेळी व्यक्त महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Super Earth: शास्त्रज्ञांना महा-पृथ्वी सापडली, पाणीच-पाणी असण्याची शक्यता, ग्रहाचं गूढ कायम
सोबत लहान मूल असल्याने जागोजागी मुक्काम

मंद्रुपहून मुंबईच्या दिशेने निघालेले आंदोलक हे सध्या सोलापूर शहरात आहेत. सदर बाजार पोलीस शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. १० ते १५ किलोमीटर अंतर चालल्यावर थोडी विश्रांती घेत आहेत. लहान मुलं असल्याने शेतकऱ्यांना जागोजागी थांबा घ्यावा लागत आहे. जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांची भेट घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची माहिती यावेळी शेतकऱ्यांनी बोलताना दिली.

महिला झोपलेली, तो आला अन् तिच्या डोक्यावर लघवी केली, धावत्या रेल्वेत टीसीचं लाजीरवाणं कृत्य
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सूचना देऊनही उताऱ्यावरून बोजा उतरलेला नाही

उद्योग मंत्री उदय सामंत हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. मंद्रुप येथील या शेतकऱ्यांनी १७४ दिवस आंदोलन केल्यानंतर उद्योग मंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर देखील अद्याप या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील बोजा उतरलेला नाही. त्यामुळे आता शेतकरी आर या पारची लढाईसाठी निघाले आहेत. मंद्रुप ते मुंबई असा बैलगाडीने प्रवास सुरु केला आहे. बुधवारी हे शेतकरी सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here