इस्लामपूर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी सागर खोत यांनी शनिवारी सकाळी कार्यकर्त्यांसह इस्लामपूर ते पेठ नाका या मार्गावर वाघवाडी फाट्याजवळ केले होते. बंदी आदेश धुडकावून जमाव करणे आणि वारणा दूध संघाचे वाहन अडवून दोन कॅनमधील दूध रस्त्यावर ओतून नुकसान केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सागर सदाभाऊ खोत (वय ३०, रा. मरळनाथपूर), बजरंग शंकर भोसले (४०, रा. पेठ) मोहसीन मज्जीद पटवेकर (३१, रा. इस्लामपूर), लालासो तुकाराम धुमाळ (३७, रा. येवलेवाडी), बबन भगवान वाघमोडे (२७), राहुल महादेव पाटील (३२, दोघे रा. सुरूल), स्वप्नील देवानंद लोहार (३०, रा. साखराळे), नंदकुमार शंकर पाटोळे (३२, रा. बिचूद) आणि धनाजी शिवाजी मोरे (४०, रा. रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आंदोलकांची नावे आहेत. याशिवाय आणखी चार ते पाच अनोळखी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आंदोलन झाले असून, इस्लामपुरात मात्र राजकीय आकसापोटी गुन्हे दाखल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
A big thank you for your article.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.