रत्नागिरी: सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. आज अधिवेशनात दुपारच्या सत्रात चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी सभागृहात कोकणातल्या साकवांसंदर्भातला मुद्दा मांडला. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सभागृहात उठून त्यांनी शेखर निकम यांनी मांडलेला पश्चिम महाराष्ट्रातील एक संदर्भाचा मुद्दा खोडून काढायला लावला. विधानसभा सभागृहात घडलेल्या किस्स्याची सध्या कोकणात चर्चा सुरू आहे. ‘नको नको तो शब्द मागे घ्या, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भावना आहेत ना बाबा’ असे सांगत स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जाणाऱ्या अजितदादांनी आपल्याच आमदाराला भर सभागृहात सुनावल्याचे पहायला मिळाले.

कोकणातल्या पुलासंदर्भात आमदार शेखर निकम हे सभागृह प्रश्न मांडायला उभे राहिले. त्यांनी बोलताना सांगितले पश्चिम महाराष्ट्राचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, एखादा पश्चिम महाराष्ट्रातला पूल होण्याच्या पैशात रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे साकव होऊ शकतात. यापूर्वी याबाबत सर्वेक्षण झालेले आहे. उदय सामंत यांनी हे सर्वेक्षण केले असल्याचे शेखर निकम यांनी सभागृहात म्हटले. पण याचवेळी पश्चिम महाराष्ट्रातला मुद्दा ऐकताच अजितदादा सभागृहात उभे राहिले आणि त्यांनी शेखर निकम यांना थांबवत शेखरजी आपण जरूर त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारा, मात्र पश्चिम महाराष्ट्राची उपमा देण्याच काय कारण आहे? ते शब्द मागे घ्या, नको नको पश्चिम महाराष्ट्राला ही काही भावना वगैरे आहेत ना बाबा, असे सांगत अजित दादांनी शेखर निकम यांना त्यांचे वक्तव्य मागे घ्यायला लावले.

Ajit Pawar: मंत्री सभागृहात गैरहजर, लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ; अजित पवारांच्या संतापाचा पारा चढला
त्यानंतर शेखर निकम यांनी अजितदादांचे कौतुक करत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकणाला पॅकेज दिले होते त्याच धर्तीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की कोकणातल्या साकवांच्या निर्मितीसाठी तसे पॅकेज देणार का? असा प्रश्न शेखर निकम यांनी सभागृहात उपस्थित केला.

अधिवेशनात अजितदादांचं रौद्ररुप, शिंदे फडणवीसांना झोडलं, इथे एक-फिल्डवर दुसरंच हे चालणार नाही!
या सगळ्या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर देताना सांगितले की, शेखर निकम आपण मांडलेल्या मुद्द्याचा या अर्थसंकल्पात नक्कीच विचार केला जाईल व सकारात्मक भूमिका घेतली जाईल. मात्र, शेखर निकम यांनी कोकणातला महत्त्वाच्या असलेल्या साकवांच्या प्रश्नाला सभागृहात उचलून धरला आहे. त्यामुळे सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनीही यासंदर्भात सातत्याने कोकणातील साकवांचा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे आता कोकणातल्या साकवांचा प्रश्न तातडीने मार्गी लागण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here