मागील काही दिवसांत अकोल्यात मिळालेला तुरीला भाव
अकोल्याच्या कृषी बाजारात ११ मार्चला तुरीचा कमीत कमी ६ हजार पासून जास्तीत जास्त ८ हजार ३८० रूपयांपर्यत भाव असून सरासरी भाव ७ हजार ६०० इतका होता. या दिवशी आवक २ हजार ७७३ क्विंटल इतकी झाली. सोमवारी म्हणजेच १३ मार्च रोजी ६ हजार ७०० ते ८ हजार ५०० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीला भाव होता. तर, सरासरी भाव ७ हजार ७०० रूपये इतका मिळाला. १२० रुपयांनी तुरीच्या दरात वाढ झाली होती. तर आवक २ हजार ५६७ इतकी झाली होती. मंगळवारी १४ मार्च रोजी ५ हजार ५०० पासून ८ हजार ४२५ रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीला दर मिळाले असून सरासरी दर ७ हजार ४०० इतका होता अन् आवक २ हजार २०३ इतकी झाली होती. म्हणजे यादिवशी तुरीच्या दरात १०० रुपयांनी घरसण झाल्याच दिसून आलं. १५ मार्चला कमीत कमी ६ हजार जास्तीत जास्त ८ हजार २५० इतका भाव तुरीला पाहायला मिळाला. म्हणजे या दिवशी तुरीच्या भावात १५० रुपयांनी घसरण झाली. तसेच १६ मार्च म्हणजे गुरुवारी तुरीला ६ हजार ८०० ते जास्तीत जास्त ८ हजार २०५ इतका भाव मिळाला. त्यामुळ गुरुवारी पुन्हा तुरीच्या भावात ४५ रुपयांनी घसरण झाली.
हरभऱ्याला कमीत कमी ४ हजार जास्तीत जास्त ४ हजार ७३० इतका भाव मिळाला असून सरासरी भाव ४ हजार ४४० इतका होता. आज हरभऱ्याची आवक ९७२ क्विंटल इतकी झाली. तर लोकल गव्हाला १ हजार ८२१ पासून जास्तीत जास्त २ हजार ४०० इतका असून सरासरी भाव २ हजार १९० रूपये इतका होता. तर अकोटच्या कृषी बाजार आज शुक्रवार असल्याने बंद असून फक्त कापूस खरेदी सुरू होती. इथेही कापसाला कालच्या प्रमाणेच भाव मिळाला.
काल अकोटच्या बाजरात कापसाला ७ हजार ८७५ पासून जास्तीत जास्त ८ हजार २९५ रूपांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे कापसाला भाव होता. कापसाच्या दरांत वाढ होईल, या अपेक्षेने कित्येक शेतकऱ्यांनी अजूनही आपला कापूस घरातच साठवून ठेवला. मात्र या कापसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे चित्र आहे. बाजारात भाव घसरल्याने विक्रीला ब्रेक लागला असल्याचे दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेने जिल्ह्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली. संततधार पावसामुळे कपाशीचे उत्पादन होण्याची शक्यता मावळत असतानाच अखेरच्या टप्प्यात बऱ्यापैकी उत्पन्न हाती आले. मात्र, कापसाचे बाजारभाव ८ हजार ५०० रुपयांच्या घरात आहेत.