मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले बिहारचे पोलीस अधीक्षक यांना मुंबई पालिकेने केलं आहे. त्यामुळे तिवारी यांना १४ दिवस क्वॉरंटाइन राहावं लागणार असून बाहेर जाऊन तपास करता येणार नाही. पालिकेने तिवारी यांना जबरदस्तीने क्वॉरंटाइन केल्याचा आरोप होत आहे.

बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे काल रविवारी पटना येथून मुंबईत तपासासाठी आले होते. ही माहिती मिळताच पालिका अधिकाऱ्यांनी काल रात्री ११ वाजता तिवारी यांना गोरेगाव येथील एसआरपी कॅम्पमध्ये क्वॉरंटाइन केलं आहे. तसेच तिवारी यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा शिक्काही मारण्यात आला आहे. दरम्यान, विनंती करूनही आपल्याला आयपीएस मेस उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. त्यामुळे सुशांतसिंह प्रकरणावरून मुंबई आणि बिहार पोलिसांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

तिवारी यांना क्वॉरंटाइन करण्यात आल्याचं ट्विट पांडेय यांनी केलं होतं. त्यानंतर मीडियाने तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता मला क्वॉरंटाइन करण्यात आलं असून माझ्या टीमशी मी फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच संपर्क साधू शकलो आहे. महाराष्ट्र सरकारची ऑर्डर दाखवल्यानंतर मला क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. मात्र, मी मुंबई विमानतळावर आल्यावर माझी कोणीही करोनाची चाचणी केली नाही किंवा त्यासंदर्भात माझी चौकशीही केली नाही. माझा करोना स्वॅबही घेण्यात आलेला नाही. मी ड्युटीवर आहे. त्यामुळे मला यातून सूट द्यायला हवी. मी १४ दिवस क्वॉरंटाइन राहिल्यास या प्रकरणाच्या चौकशीवर परिणाम होईल, असं तिवारी यांनी सांगितलं. दरम्यान, मुंबई महापालिकेने तिवारी यांना क्वॉरंटाइन केल्याने बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी आज दुपारी २ वाजता बिहार पोलिसांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

विनय तिवारी काल मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात आमची टीम चांगला तपास करत असल्याचं मीडियाशी बोलताना सांगितलं होतं. गेल्या आठवड्याभरापासून आम्ही अनेकांचे जबाब नोंदवले असून त्याचं विश्लेषण केल्यानंतर आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू. मात्र आम्हाला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल मिळाला नाही, असंही तिवारी यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलीस मुंबईत आली आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी पटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर तातडीने बिहारची टीम मुंबईत पोहोचली. साधारणपणे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आलेल्या पोलिसांना स्थानिक पोलिसांकडून मदत केली जाते. मात्र, बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांकडून कोणतंही सहकार्य मिळत नसल्याचं दिसून आलं आहे. बिहार पोलिसांना सुशांतसिंह प्रकरणातील संबंधितांचे जबाब घेण्यासाठी गाडीही देण्यात आली नाही. त्यामुळे या पोलिसांना रिक्षा किंवा टॅक्सीने फिरावं लागत आहे. अंकिता लोखंडेच्या घरी जाण्यासाठी तर बिहार पोलिसांना ३ किलोमीटरची पायपीट करावी लागली. ही माहिती मिळाल्यानंतर जबाब नोंदवून झाल्यावर अंकिताने पोलिसांना स्वत:ची जॅग्वार कार दिली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here