या पार्श्वभूमीवर कणेरी मठावरील श्री सिद्धगिरी महासंस्थानने आत्मनिर्भर अर्थात स्वावलंबी ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेतला. मठाधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येणार आहे. त्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून परिसरातील शंभर गावांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व गावातील सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. यासाठी मठाची एक टिम कार्यरत झाली आहे.
या योजनेनुसार दैनंदिन जीवनात जे काही लागते ते सर्व या शंभर गावातच उत्पादित केले जाईल. धान्य, भाजीपाला, कपडे, गॅस या सर्व उत्पादनांना शंभर गावातच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी सर्व दुकानदारांची मदत घेण्यात येणार आहे. शंभर गावातच उत्पादक व ग्राहक यांची साखळी होईल. यातून स्थानिक लोकांनाच जे हवे ते या गावातच मिळेल. तेही दर्जेदार आणि कमी दरातही. विशेष म्हणजे ही गावे एलपीजी मुक्त करण्यात येणार आहेत. गावागावात गोबरगॅस प्रकल्प राबवत एकमेकांना गॅस पुरवठा करण्यात येईल. युवकांना रोजगार, महिलांना उद्योग, बचत गटांना काम मिळवून देत सर्वांनाच स्वावलंबी करण्याची ही योजना आहे.
महिला प्रवाशांकडून शिंदे सरकारचं तोंडभरून कौतुक; म्हणाल्या आमच्या हिताचा निर्णय घेतला
स्वावलंबी ग्राम योजना जुन्या काळात होती, तीच पुन्हा एकदा सुरू करण्याचा मानस आहे. यासाठी शंभर गावे निवडण्यात आली आहेत. तेथे ही योजना यशस्वी झाल्यानंतर गावांची संख्या वाढविण्यात येणार आहे. देशभरात मॉडेल म्हणून हे अभियान राबविण्यात येईल, अशी माहिती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी दिली.