भोपाळ: अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज पासून सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर भूमिपूजनाच्या मुहूर्तावरून राजकीय प्रतिक्रियांमध्ये आता वाढ होऊ लागली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते () यांनी केंद्रीय गृहमंत्री () आणि राम मंदिराच्या पुजाऱ्याला झालेल्या करोनाची लागण राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुहूर्ताशी जोडली आहे. सनातन धर्म आणि हिंदू परंपरेचे उल्लंघन केल्यामुळेच या नेत्यांना करोनाची लागण झाल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

अशुभ मुहूर्तामुळेच झाला करोना- दिग्विजय सिंह

माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत भाष्य केले आहे. हिंदू धर्मातील मान्यतांना न मानल्यामुळेच असे झाल्याचे ते म्हणाले. अशुभ मुहूर्तावर भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राम मंदिराच्या पुजाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे दिग्विजय म्हणाले.

हिंदू मान्यतांना बाजूला सारल्याचाच हा परिणाम- दिग्विजय सिंह

सनातन हिंदू धर्माच्या मान्यता डावलल्याचाच हा परिणाम असल्याचे दिग्विजय सिंह यांनी लिहिले आहे. या मुळे राम मंदिराच्या पुजाऱ्याला झाला, त्यात प्रमाणे उत्तर प्रदेशच्या मंत्री कमलाराणी वरुण यांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्षाचे उत्तर अध्यक्षही करोनामुळे रुग्णालयात भरती आहेत, असे दिग्विजय सिंह यांनी लिहिले आहे.

गृहमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत करोना

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष हे देखील रुग्णालयात करोनावर उपचार घेत आहेत. तसेच कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री एडियुरप्पा यांना देखील करोना झाला असून, तेही रुग्णालयात उपचार घेत आहेत, याकडे ट्विटच्या माध्यमातून दिग्विजय सिंह यांनी लक्ष वेधले आहे.

वाचा बातमी:

वाचा बातमी: राम मंदिर भूमिपूजनावर अनेक संतानी उपस्थित केले प्रश्न

अनेक साधूंसह काशीचे ज्योतिष्यांन देखील राम मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा मुहूर्त अशुभ असल्याचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती(Shankaracharya Swaroopanand Saraswati) यांनी देखील या पूर्वी म्हटले आहे. या पूर्वी त्यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी देखील आपल्या फेसबुक पेजवर राम मंदिराच्या भूमिपूजनाची तिथी, अर्थात ५ ऑगस्ट हा दिवस अशुभ दिवस असल्याचे सांगितले आहे.

ही देखील बातमी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here