बुलढाणा : देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील पती-पत्नी व मुलगा जालना येथून नातलगाचा लग्नसोहळा आटोपून घराकडे परतत असताना विचित्र अपघात झाला आहे. हा अपघात १७ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडला असून अपघातात पती-पत्नी ठार झाले आहेत. दाम्पत्याच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील जळ पिंपळगाव येथील भगवान भानुदास काकड (वय वर्ष ४५), कासाबाई भगवान काकड आणि त्यांचा मुलगा समाधान काकड हे लग्नासाठी जालना येथे गेले होते. मात्र लग्नाहून घरी परतत असताना काकड हे प्रवास करत असलेल्या पिकअप वाहनाला देऊळगाव राजा बायपासजवळ वीरा हॉटेल परिसरात विचित्र अपघातात घडला. पिकअपच्या मागील लोखंडी केबिन मागच्या मागे घसरून हा अपघात घडला. सदर अपघातात वाहनाच्या लोखंडी केबिनमध्ये मागे बसलेल्या कासाबाई भगवान काकड या जागीच ठार झाल्या, तर त्यांचे पती भगवान भानुदास काकड हे गंभीर जखमी झाले.

अवकाळी पाऊस, शेतकरी हवालदिल; संभाजीराजे सरकारवर संतापले, ‘इतकी असंवेदनशीलता कुठून येते?’

भगवान काकड यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांनीही प्राण सोडले. या अपघातावेळी काकड यांचा मुलगा समाधान हा पुढे चालकाच्या बाजूला बसला असल्याने त्याचा जीव वाचला आहे.

दरम्यान, काकड दाम्पत्याच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार असून दाम्पत्याच्या निधनाने मुलांच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here