पुणे: अभिनेता याने आत्महत्या करणं हे क्लेशदायक आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचं कुणीही राजकारण करू नये. बिहारच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असून या प्रकरणाला राजकीय रंग देऊन कोणीही राजकीय पोळू भाजू नका, असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार यांनी केलं आहे.

रोहित पवार यांनी फेसबुकवरून हे आवाहन केलं आहे. रोहित यांनी सुशांतसिंहवर एक दीर्घ पोस्ट लिहून सुशांतच्या आत्महत्येवरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. बिहारमधील एका सामान्य कुटुंबातील एक तरुण मुंबईत येतो काय… पाहता पाहता चंदेरी दुनियेत यशाच्या शिखरावर पोचतो काय आणि एक दिवस अचानक दृष्ट लागावी तसं वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षीच तो आत्महत्या करतो काय… अभिनेता सुशांतसिंहच्या बाबतीत घडलेली ही घटना सर्वांनाच चक्रावणारी व मनाला चुटपूट लावणारी आहे. या घटनेला आता दीड महिना झालाय. सुरवातीला मुंबई पोलीस आणि चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित असलेलं हे प्रकरण आता हळूहळू राजकीय रंग घेतंय की काय अशी शंका येऊ लागलीय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

या घटनेत कुणी दोषी असेल तर त्याचा निष्पक्षपणे तपास व्हायलाच हवा. गुणवत्तेमध्ये जगात ज्या ठराविक पोलिसांचं नावं घेतलं जातं त्यात मुंबई पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळं मुंबई पोलीस या घटनेचा सखोल तपास करतील, यात कोणतीही शंका नाही. या घटनेत चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांची त्यांनी आतापर्यंत चौकशीही केलीय. त्यामुळं मुंबई पोलीस हे सक्षम असून त्यांच्याकडून योग्य तपास होऊन याप्रकरणी न्याय मिळेल, असा विश्वास आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

बिहार पोलिसांना टोला

यावेळी रोहित पवार यांनी बिहार पोलिसांना टोला लगावला आहे. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्येही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि लगोलग बिहार पोलीस या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबईतही दाखल झाले. वास्तविक, बिहार पोलीस इतके कार्यतत्पर असतील हे मला माहीत नव्हतं. तिथल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत वृत्तपत्रातून किंवा टीव्हीवरुन ऐकलेल्या-वाचलेल्या बातम्यांमधून ते इतके दक्ष असतील असं वाटलं नव्हतं. की केवळ याच घटनेपुरती त्यांनी तत्परता दाखवली, हे माहीत नाही, असा चिमटा काढतानाच खरंच ते इतके कर्तव्यदक्ष असतील तर त्याचं स्वागतच करायला हवं आणि यामुळं बिहारमधील गुन्हेगारीचं प्रमाणही कमी होईल, अशी अशी अपेक्षा करायलाही हरकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

एका लोकप्रिय अभिनेत्याच्या आत्महत्येचं कुणी राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे. बिहारमध्ये तोंडावर आलेल्या निवडणुका पाहिल्या तर या घटनेचा कुणीही आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग करून घेता कामा नये आणि असं कुणी करत असेल तर तो प्रयत्न आपण सर्वांनीच हाणून पाडायला हवा. सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. आपला देश म्हणजे कायद्याचं राज्य आहे. असं असेल तर तिथं सर्वांना समान न्याय मिळालाच पाहिजे. म्हणूनच सुशांतच्या अकाली जाण्याचा निःपक्षपाती तपास झालाच पाहिजे आणि करोनाच्या संकटामुळे कुणावर आत्महत्येची वेळ येणार नाही याचीही दक्षता घ्यायला पाहिजे. याबाबत देशातील सर्व राज्य सरकारे व केंद्र सरकार यांनी भेदभाव, राजकारण, हेवेदावे विसरुन एकत्रित काम करायलाच पाहिजे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here